कलियुगाच्या शेवटी भविष्य मालिकेची गरज
युग चक्रानुसार पहिले सत्ययुग, दुसरे त्रेतायुग, तिसरे द्वापारयुग आणि शेवटी कलियुग येते. सध्या कलियुगाचे संपूर्ण युग संपले असून युग संध्या चालू आहे. कोणत्याही युगाचा शेवट आणि नव्या युगाची सुरुवात याला ‘युगसंध्या’ किंवा ‘संगम युग’ म्हणतात. मनुस्मृतीच्या आधारे कलियुगाचे वय 4,32,000 वर्षे मानले जाते. परंतु मानवाने केलेल्या घोर पापकर्मांमुळे 4,27,200 वर्षे नष्ट होऊन केवळ 4,800 वर्षेच भोग भोगावे लागतील असे वर्णन आहे. मनुस्मृतीनुसार पुढील श्लोक याचा पुरावा देतात –
“चत्त्वार्य्जाहु सहस्राणि वर्षाणां तत् कृतम् युगम्
तस्य तवच्छता संध्या संध्यांशश्च तथाविधः”
वरील श्लोकाचा अर्थ असा – कलियुगाच्या चार हजार वर्षांनी सत्ययुग येतो. त्या चार हजार वर्षांचे परमायु आणि त्याची संध्या आणि संध्यांश हे शंभर वर्षांचे आहे. म्हणजे
कलियुगाचे वय = 4000 वर्षे
सुरुवातीच्या आणि शेवटी दोन संध्या = 400X2 = 800 वर्षे
एकूण 4,800 वर्षे हा कलियुगाचा उपभोग काळ आहे.
कालांतराने, पंचसखांपैकी एक, भगवान विष्णूंचे परमसखा सुदामाजींचे अवतार, ब्रह्म गोपाळ महापुरुष अच्युतानंद दासजी महाराज यांनी, महाप्रभू जगन्नाथ जींच्या सुचने नुसार, मनुस्मृतीत नमूद केलेल्या कलियुग किंवा भोग काळातील 4,800 वर्षे पुन्हा बदलुन 5,००० वर्षे केलीत असा उल्लेख भविष्य मालिकेत मिळतो.
“चारि लक्ष जे बतिश सहस्त्र,
कलियुग र अटइ आयुष ।
पाप भारा रे कलि तुटि जिब,
पांच सस्र कलि भोग होइब।“
वर लिहिलेल्या पंक्ती मध्ये अच्युतानंद दासजी महाराज म्हणतात की – कलियुगाचे वय 4,32,000 वर्षे आहे. परंतु मनुष्याने केलेल्या पापकर्मांमुळे त्याचे वय क्षय होऊन केवळ 5 हजार वर्षे भोगावे लागतील. सध्या मां बिरजा पंचांग, जगन्नाथ पंचांग, कोहिनूर पंचांग इत्यादींनुसार कलियुगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत 5,125 वर्षे भोग चालू आहेत. याचा अर्थ कलियुग पूर्णपणे संपले आहे आणि आपण संध्यायुगात किंवा संगमयुगात प्रवेश केला आहे. म्हणूनच सध्याच्या काळात मानवी समाजाच्या कल्याणासाठी भविष्य मालिका ग्रंथाची नितांत गरज आहे. पुन्हा महापुरुष अच्युतानंद दास जी भविष्य मालिका मध्ये म्हणतात की –
“संसार मध्यरे केमंत जाणिबे नर अंगे देह बहि गत आगत जे युग र ब्यबस्था समस्तन्कु जणा नाहीं“
(शिव कल्प नवखंड नीर्घण्ट)
महापुरुष अच्युतानंद दासजी महाराजांनी “मालिका ग्रंथ” शिव कल्प नवखंड निर्घंट मध्ये वर्णन केले आहे कि – मनुष्याला युग परिवर्तना संबंधित गोष्टी किंवा त्याच्या प्रारंभी आणि शेवटी येणारी संकटे मोह – माया मध्ये अडकून भ्रमीत झाल्यामुळे कळू शकणार नाहीत. जाणकार सज्जन सुद्धा भरकटतील आणि गोंधळून जातील आणि आध्यात्मिक चर्चेदरम्यान ते अतिशयोक्ती करून सांगतील की कलियुगाची बाल्यावस्था सुरु आहे.
“उदयति: यदि भानु पश्चिम दिग बिभागे, बिकशति यदि पद्म पर्वतानां शिखाग्रे।
प्रचलति यदि मेरु शितो तापती बन्ही, नटलतिं खडू बाक्य सज्जनानां कदाचित।“
अर्थात – येणाऱ्या काळात सूर्यदेव पश्चिमेला उगवू शकतात, पर्वत शिखरावर कमळ फुलू शकते, मेरू पर्वत दक्षिणेकडून उत्तर दिशेत जाऊ शकतो , अग्नी थंडावा देऊ शकते किंवा बर्फही उष्णता देऊ शकतो, परंतु थोर पुरुष अच्युतानंद दास जी किंवा मालिका ग्रंथात उल्लेखलेल्या कोणत्याही संत सज्जन आणि महापुरुषांची सत्य वाणी बदलू शकत नाही.
जय श्री सत्य अनंत माधव