कलियुग पूर्ण झाल्याबद्दल श्री जगन्नाथाच्या क्षेत्रातून मिळालेले संकेत
1. महात्मा पंचासखांनी मिळून निराकार ईश्वराच्या निर्देशानुसार भविष्य मालिका ग्रंथाची रचना केली. भविष्य मालिका प्रामुख्याने कलियुगाच्या अधोगतीबद्दल सामाजिक, भौतिक आणि भौगोलिक बदलांच्या लक्षणांचे वर्णन करते. धर्मग्रंथातील लिखाणाव्यतिरिक्त, श्री जगन्नाथजींच्या मुख्य क्षेत्राचे वर्णन आदि वैकुंठ (मर्त्य वैकुंठ) असे केले आहे. कलियुगाच्या 5000 वर्षानंतर भक्तांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी पंचसखांनी सांगितले की, भगवंताच्या इच्छेनुसार श्री जगन्नाथजींच्या नीलांचल परिसरातून विभिन्न संकेत मिळतील आणि भक्तांनी त्या संकेतांचे आकलन करावे. या संकेतांमुळे भक्तांना कलियुगाच्या अंताविषयी व प्रभुंच्या कल्कि अवतार विषयी पूर्णपणे सूचना मिळेल याचे वर्णन खालील पंक्तीत केले आहे.
“दिव्य सिंह अंके बाबू सरब देखिबु,
छाड़ि चका गलु बोली निश्चय जाणिबू
नर बालुत रुपरे आम्भे जनमिबू”
(गुप्त ज्ञान- अच्युतानंद दास)
महात्मा अच्युतानंदजींनी वरील श्लोकात महाप्रभु श्री जगन्नाथ जिंचे प्रथम सेवक आणि सनातन धर्माचे ठाकुर राजा (चौथे दिव्य सिंह देव) यांच्या बद्दल वर्णन केले आहे. राजा इंद्रद्युम्नच्या परंपरेनुसार श्री क्षेत्र जगन्नाथांच्या प्रदेशात कारभार बघण्यासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे राजे होते, असेही महापुरुषांनी नमूद केले आहे. जेव्हा चौथे दिव्य सिंहदेव कार्यभार सांभाळतील तेव्हा कलियुगाला 5000 वर्षे भोग झालेला असेल . याद्वारे महापुरुष अच्युतानंद यांनी दोन गोष्टी सिद्ध केल्या, एकीकडे चौथे दिव्य सिंह देव राजा म्हणून पदभार सांभाळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलियुगाचे 5000 वर्ष भोग होऊन गेले आहे. (आज कलियुगाला 5,125 वर्षे चालू आहे.) महात्मा अच्युतानंद यांनी मालिकेत लिहीले आहे की जेव्हा चौथे दिव्य सिंह देव सत्तेवर असतील (जे आज आहेत), तो कलियुगाच्या समाप्तीचा पुरावा असेल. पुन्हा महापुरुष अच्युतानंद जींनी वरील पंक्तींमध्ये स्पष्ट केले की जेव्हा चतुर्थ दिव्यसिंह देव राजा श्रीक्षेत्रात राज्य करतील तेव्हा भगवान जगन्नाथ कल्कि अवतार घेतील आणि भगवान जगन्नाथ मानव रूपात जन्म घेतील आणि धर्म स्थापनेचे कार्य करतील.
2. महापुरुष अच्युतानंद जी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की चौथे दिव्य सिंह देवाच्या काळात कलियुग पूर्ण होईल आणि भगवान जगन्नाथ यांना कल्किच्या रूपात बालक म्हणून जन्म घ्यावा लागेल. थोर अच्युतानंदांनी त्यांच्या ‘अष्टगुजरी’ ग्रंथा मध्ये स्पष्ट लिहिले आहे कि-
“पूर्व भानु अबा पश्चिमें जिब
अच्युत बचन आन नोहिब ।
पर्वत शिखरे फुटिब कईं
अच्युत बचन मिथ्या नुंहइ।
ठु ल सुन्यकु मु करिण आस
ठिके भणिले श्री अच्युत दास”
अर्थात:-
महान अच्युतानंद दासजी भक्तांच्या अंतःकरणात भक्ती आणि श्रद्धा जागृत करण्यासाठी गर्जना करून मालिकेची शुद्धता आणि सत्यता उद्घोषित करतात आणि म्हणतात की सूर्य पश्चिमेला उगवेल आणि पर्वताच्या शिखरावर कमळ फुलू शकेल, पण त्यांनी लिहिलेले सत्य वाणी कधीही चुकीची ठरणार नाही.
“दिव्य केशरी राजा होइब
तेबे कलियुग सरिब
चतुर्थ दिब्य सिंह थिब
से काले कलियुग थिब”
अर्थात:-
महापुरुष अच्युतानंद यांनी वरील पंक्तींमध्ये लिहिले आहे की जेव्हा चौथे ‘दिव्यसिंह देव’ श्रीक्षेत्रात राजा होतील, तेव्हा कलियुगाच्या अंताच्या आधीच सत्ययुग सुरू होईल, परंतु सत्ययुगाचा प्रभाव तेथे राहणार नाही. पुन्हा एकदा पंचसखांपैकी एक महापुरूष जगन्नाथ दासजी जे माता राधारांनी यांच्या हास्याद्वारे अवतरित झाले होते त्यांनीही ‘वज्र कंठ ‘ ग्रंथात घोषणा केली कि-
“पुरुषोत्तम देब राजान्क ठारु,
उनबीन्स राजा हेबे सेठारु,
उनबीन्स राजा परे राजा नांहि आउ,
अकुली होइबे कुलकु बोहु “।
वरील पंक्तींमध्ये महापुरुष श्री जगन्नाथ दासजींनी लिहिले आहे की या जगन्नाथ प्रदेशाचे पहिले राजा श्री पुरुषोत्तम देव असतील. सर्वप्रथम, राजा श्री पुरुषोत्तमदेव यांच्यासह 19 राजे मंदिराच्या कारभाराची जबाबदारी सांभाळतील. सध्या मालिकाचे वचन खरे ठरले असून श्री दिव्य सिंह देव हे 19 वे राजा म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत आणि त्याचवेळी महापुरुष जगन्नाथ दास यांनी 19 वे राजा श्री दिव्य सिंह देव असून त्यांना कुठलेही अपत्य नसेल असे लिहिले आहे. आज भगवंतांचे भक्त मालिकेचे म्हणणे मानत असुन त्यांना पुरावे देखील मिळत आहेत. 600 वर्षांनंतर महापुरुषांनी जे लिहिले ते प्रत्यक्षात घडले आहे. त्यामुळे आपण हे समजून घ्यायला हवे की कलियुग संपले असून धर्मसंस्थापनेचे कार्य सुरु आहे. महापुरूष अच्युतानंदांनी भविष्य मालिका मध्ये रचना केली आहे:
“चुलरु पथर जेबे ख़सिब सूत,
ख़सिले अंला बेढ़ा रु हेब ए कलि हत।”
महापुरुष अच्युतानंद दास जी यांनी भक्तांना सुचित करण्यासाठी भविष्यमालिकेत लिहीले आहे की जेव्हा श्री जगन्नाथ धामच्या मुख्य मंदिरातून दगड पडेल तेव्हा आपल्याला कळेल की कलियुगाचा अंत झाला आहे आणि महापुरुषाचे हे शब्दही खरे ठरले आहेत. 16.06.1990 मध्ये श्री मंदिराच्या आमला बेढा येथून एक दगड पडला आणि त्याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प विभागाने एक समिती गठीत केली होती, पण एवढा मोठा दगड (1 टनापेक्षा जास्त वजन असलेला) कुठून आला व कसा पडला हे आजपर्यंत शास्त्रज्ञांना कळू शकले नाही. शास्त्रज्ञांसाठी ही एक आश्चर्यकारक घटना आहे. सर्व महात्म्यांची व ऋषींची वचने खरी ठरली असून भक्तांना सावध करण्यासाठी कलियुगाचा अंत झाल्याचा पुरावा श्री क्षेत्र जगन्नाथ धामाच्या आमला बेढ्यावरून दगड पडल्याने मिळालेला आहे.
3. महापुरुष अच्युतानंद यांनी त्यांच्या भविष्य मालिका ग्रंथ ‘गरुड संवादात’ नमूद केले आहे की एके दिवशी प्रभूचे मुख्य भक्त विनिता नंदन गरुड यांनी महाप्रभूंना विचारले की “भगवान, तुम्ही चारही युगांमध्ये अवतार घेतला आहे आणि कलियुगाच्या शेवटी तुम्ही कल्किच्या रूपात अवतार घ्याल.” तेव्हा चार युगांचे भक्त आणि भगवान यांचे मिलन होईल . जेव्हा तुम्ही निलाचल धाम सोडाल, जेव्हा दारू ब्रह्मातून साकार ब्रह्म व्हाल, तेव्हा नश्वर वैकुंठातून भक्तांना अशी कोणती चिन्हे दिसतील, ज्यामुळे भक्तांचा असा विश्वास होईल की कल्कि अवताराची वेळ आली आहे आणि भविष्यमालिका ग्रंथाचे अनुसरण करून ते आपले आशिर्वाद प्राप्त करतील?”
महापुरुष अच्युतानंद यांनी भविष्य मलिकामध्ये लिहिले आहे:
“बड़ देउल कु आपणे जेबे तेज्या करिबे,
कि कि संकेत देखिले मने प्रत्ये होइबे ।”
वरील पंक्तींचा तात्पर्य असा की:-
प्रभू जेव्हा निलांचल सोडतील, तेव्हा भक्तांना एक संकेत मिळेल ते पाहूनच विश्वास बसेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत:
“गरुड़ मुखकु चाँहिण कहुचंति अच्युत,
क्षेत्र रे रहिबे अनंत बिमला लोकनाथ।”
वरील पंक्तींमध्ये प्रभू गरुडजींना म्हणतात:-
“जेव्हा मी निलांचल स्थान सोडून जाईन, तेव्हा माझे मोठे बंधू बलराम जी निलांचल प्रदेशाचा कारभार सांभाळतील आणि निलांचल प्रदेशाचे क्षेत्रधिश्वर होतील, शक्तीस्वरूपिणी मां विमला आणि लोकनाथ महाप्रभू त्या वेळी त्या प्रदेशात असतील, पण मी मनुष्य रूपात जन्म घेईल”. नंतर गरुडजींनी विचारले की, “असे पहिले कोणते संकेत असेल कि भक्त मालिका वाचून समजतील कि आपण नीलांचल क्षेत्र सोडले आहे?” महापुरुष अच्युतानंदांनी पुन्हा वर्णन केले आहे:
“देउल रु चुन छाड़िब, चक्र बक्र होइब,
माहालिआ होइ भारत अंक कटाउ थिब।“
वरील पंक्तींचा अर्थ असा आहे कि:-
श्री जगन्नाथ मंदिराच्या भिंतीतून जे चुन्याचे लिंपन आहे त्यातून काही प्रमाणात चुना बाहेर पडेल आणि मंदिरावरील निल चक्र थोडे वाकडे होईल. आणि त्या वेळी भारताची आर्थिक स्थिती चांगली राहणार नाही. वरील पंक्तीवरून कळते: जेव्हा जगन्नाथ मंदिराच्या भिंतीतून चुना पडला, त्यावेळचे पंतप्रधान चंद्रशेखर होते आणि 3000 टन सोने गहाण ठेवून भारताने पैशाची कमतरता भरून काढली आणि त्यानंतर भारताने आपली आर्थिक स्थिती सुधारली. मालिकेच्या वरील ओळीवरून हे सिद्ध होते की 600 वर्षांपूर्वी महापुरुष अच्युतानंद दासजींनी लिहिले होते की जगन्नाथ मंदिराच्या भिंतीतून चुना पडेल तेव्हा भारताची आर्थिक स्थिती चांगली राहणार नाही आणि आज ते सिद्ध झाले आहे. महाप्रभू श्री कृष्ण दुसर्या संकेताबद्दल सांगतात:
“बड़ देउल रु पथर जेबे ख़सिब पुण,
गृध्र पक्षी जे बसिब अरुण र स्तम्भेण।“
या पंक्तींचा अर्थ असा आहे की:-
जेव्हा श्री क्षेत्र जगन्नाथ धाम च्या आमला बेढा या ठिकाण हून एक दगड पडेल, तेव्हा अरुण (सुर्यपुत्र अरूण) स्तंभावर गिधाड ( चील) पक्षी बसेल. ज्या वेळी आमला बेढा वरून दगड पडला, त्या वेळी अरुण स्तंभावर गिधाड पक्षीही बसला होता म्हणून हे सिद्ध झालं आहे.
4. आपल्या शास्त्रीय परंपरेनुसार एखाद्या घरावर गिधाड पक्षी बसला तर त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी धोका असतो. त्याचप्रमाणे श्री जगन्नाथ मंदिराच्या अरुण स्तंभावर गिधाड पक्ष्याचे दिसने हे जगातील मानवी समाजासाठी मोठ्या धोक्याचे लक्षण आहे. हेच कलियुगाच्या समाप्तीचे आणि धर्माच्या स्थापनेचे पहिले संकेत मानले जाते.
तेव्हा महापुरुष अच्युतानंदांनी भक्त शिरोमणी गरुडजींना दिलासा दिला –
“एही संकेत कु जानिथा हेतु मति की नेई,
तोर मोर भेट होइब मध्य स्थल रे जाई।“
वरील श्लोकाचा अर्थ असा आहे:-
गरुड जी विचारतात,” प्रभू जेव्हा आपण कल्की रूपात धरावतरण कराल तेव्हा मी आपणास कुठे भेटू शकेन “? मी तुमचे दर्शन कसे मिळवू शकेन आणि तुमच्या सेवेत स्वतःला कसे समर्पित करू शकेन? महाप्रभूंनी उत्तर दिले: “गरुडा, मी तुला तेथे भेटेन जिथे ब्रह्मदेवाचा शुभ स्तंभ आहे, जो पृथ्वीचा सूर्यस्तंभ मानला जातो आणि त्याला पृथ्वीचा केंद्र म्हणतात”. महापुरुष अच्युतानंदजींनी “हरिअर्जुन चौतिसामध्ये” कलियुगाच्या समाप्तीबद्दल आणि भगवान कल्कींच्या जन्माविषयी, श्री मंदिरात मिळालेल्या इतर संकेता बद्दल सांगितले आहे.
“नीलाचल छाड़ि आम्भे जिबु जेतेबेले
लागिब रत्न चांदुआ अग्नि सेते बेले
निशा काले मन्दिररु चोरी हेब हेले,
बड़ देऊलुमोहर ख़सिब पत्थर,
बसिब जे गृध्र पक्षी अरुण स्तम्भर।
बतास रे बक्र हेब नीलचक्र मोर।“
वरील पंक्तींचा अर्थ असा आहे की:-
महापुरुष अच्युतानंद जी हे स्पष्टपणे सिद्ध करत आहेत – भगवंत म्हणतात की “मी जेव्हा नीलांचल क्षेत्र सोडेल तेव्हा माझ्या रत्नजडित सिंहासनावरील रत्नजडित छत्रात प्रथम आग लागेल आणि माझ्या श्री मंदिराच्या परिसरात अर्ध्या रात्री चोरी होईल. दिग्गजांवरून दगड पडतील.(बतास) वादळ मुळे नीलचक्र वाकडे होईल. माझ्या अरुणस्तंभावर गिधाड पक्षी बसेल. या सर्व गोष्टी मंदिरात श्री जगन्नाथ क्षेत्रामध्ये घडल्या असून मालिकेची वाणी पूर्णपणे खरी ठरेली आहे. यावरून कलियुगाच्या अंताची ही पुष्टी झाली आहे. त्यानंतर “कलियुग गीतेच्या” दुसर्या अध्यायात महापुरुष अच्युतानंद श्री जगन्नाथ क्षेत्रातील विशेष लक्षणांची माहिती देतात.
“मुंहि नीलाचल छाड़ि जिबि हो अर्जुन,
मोहर भंडार घरे थिब जेते धन।
तांहिरे कलंकी लागि जिब क्षय होइ,
मोहर सेवक माने बाटरे न थाई“।
वरील पंक्तींचा अर्थ:-
अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, “तुम्ही नीलांचल सोडले तर श्रीक्षेत्रातून कोणती चिन्हे दिसतील, कृपया मला त्याबद्दल सांगा”? भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले, “अर्जुना, जेव्हा मी नीलांचल क्षेत्र सोडून जाईन, तेव्हा मंदिर परिसरातील स्तिथ भांडार घराची ख्याती कमी होईल, याचा अर्थ भांडार घरातील धन नष्ट होईल आणि खजिनदार सेवक धर्माचे आचरण करणार नाही आणि भांडार घरातील धन रिक्त होईल”. महापुरूष अच्युतानंदांनी “कलियुग गीतेच्या” दुसऱ्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे:
“बहुत अन्याय करि अरजिबि धन,
तंहिरे ताहांक दुःख नोहिब मोचन ।
खाइबाकु नमिलिब किछि न अन्टिब,
मोहर बड़पण्डान्कु अन्न न मिलिब ।
मोहर बड़ देऊलु ख़सिब पत्थर,
श्रीक्षेत्र राजन मोर नसेबि पयर
राज्य जिब नाना दुःख पाइबा टी सेइ,
तांकू मान्य न करिब अन्य राजा केहि।“
या पंक्तींचा अर्थ असा आहे:-
“मी जेव्हा निलांचल क्षेत्र सोडून जाईन, तेव्हा कलियुग संपेल. मी श्रीक्षेत्र सोडताच माझ्या क्षेत्रात खूप अन्याय होईल. माझ्या अधीनस्थ असलेले पार्षद ( सेवक) वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय करून पैसे कमवतील आणि येणार्या काळात माझे मुख्य सेवक ही व्यवस्थित पणे स्वतः चे भरण पोषण करू शकणार नाहीत असे अनेक बदल श्री मंदिरात होणार आहेत”. महापुरूष अच्युतानंद दास यांनी मलिकामधील जगन्नाथ प्रदेशातील आणखी एका संकेताचा उल्लेख केला आहे:
“पेजनला फुटी तोर पडिब बिजुली,
से जुगे जिब की प्रभु नीलांचल छाड़ि।“
वरील पंक्तींचा अर्थ असा आहे:-
जेव्हा श्री जगन्नाथ मंदिरा च्या स्वयंपाकघरात वीज पडेल, तेव्हा कलियुग समाप्त होईल आणि श्री जगन्नाथ निलांचल क्षेत्र सोडून मानवरूप धारण करतील. पूर्वी श्री जगन्नाथ मंदिरा च्या स्वयंपाकघरात वीज पडली होती. यावरून श्री जगन्नाथजींनी नीलांचल क्षेत्र सोडून मानवी देह धारण केला आहे असे सिद्ध होते. पुन्हा महापुरुष अच्युतानंद यांनी “चौषठी पटल” या ग्रंथात जगन्नाथ प्रदेशातील आणखी एका संकेताचे वर्णन केले आहे, ज्यात श्री कल्पवृक्षाची महिमा आणि श्री कल्पवृक्षाचा क्षय, कलियुगाचा अंत आणि भगवान श्री जगन्नाथ नीलांचल क्षेत्र सोडून मानवी देह धारण करण्याचे प्रमाण देत आहेत.
“से बट मुलरे अर्जुन जेहु बसिब दंडे,
मृत्यु समये न पड़िब यम राजर दंडे ।
से बट मोहर बिग्रह जंहु हेले आघात,
मोते बड़ बाधा लागई सुण मघबासूत।
से बट रु खंडे बकल जेहु देब छड़ाई,
मोहर चर्म छडाइला परि ज्ञांत हुअइ।“
या पंक्तींचा अर्थ:-
श्री मंदिरातील कल्पवृक्ष हे भगवंतांचे साकार रूप प्रमाणेच आहे. कल्पवृक्षाची तुलना भगवंतांच्या शरीराशी केली आहे.कल्पवृक्षाचा लहानसा तुकडाही तुटला तर भगवंतांच्या शरीराला खूप त्रास होतो. आज कल्पवृक्षाची फांदी पुन्हा पुन्हा तुटत आहे हा विचार करण्याजोगा आहे, याचा अर्थ महापुरुषांच्या वाणी अनुसार कल्पवृक्षाची फांदी तुटली तर भगवंत नीलांचल क्षेत्र सोडून मानवाचे शरीर धारण करतील. अच्युतानंदांनी या विषयावर वर्णन केले आहे:-
“कल्प्बट घात हेब जेतेबेले
नीलाचल छाड़ि जिबे मदन गोपाले।
कल्प्बट शाखा छिड़ि पड़िब से काले,
नाना अकर्म मान हेब क्षेत्रबरे।
रूद्र ठारु उनविंश पर्यन्त सेठारे,
स्थापना होइबे मोर सेवादी भाबरे।
बड़ देउलरे मुंही नरहिबी बीर,
बाहार होइबि देखि नर अत्याचार।“
अर्थ:-
महापुरुष अच्युतानंद जी यांनी वरील पंक्तींमध्ये नमूद केले आहे की, जेव्हा कल्पवृक्षाची शाखा तुटेल तेव्हा माझ्या परिसरात खूप अन्याय, अनैतिकता, अनुशासनहीनता आणि अराजकता पसरेल. यावेळी भगवान श्री जगन्नाथ मनुष्यांच्या पाप व अत्याचाराला बघुन श्री मंदीराचा त्याग करून मानव शरीर धारण करतील. जेव्हा भगवान कल्की यांचे वय 11 ते 19 वर्षांच्या दरम्यान असेल तेव्हा, श्रीमंदिराची देखभाल करण्यासाठी सरकारकडून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. यावेळी भगवान श्री जगन्नाथ मानवाचे अत्याचार पाहून मंदिरातून बाहेर पडून मानव शरीर धारण करतील. मालिकामधील तथ्य आज खरे ठरले आहे. पुन्हा महात्मा अच्युतानंद या परिस्थितीचे वर्णन करतात की:-
“बड़ देऊलु, मोहर पत्थर ख़सिब,
गृध्र पक्षी नील चक्र उपरे बसिब।
दिने दिने चलुरे मु न होइबि दृश्य,
भोग सबु पोता हेब जान पाण्डु शिष्य।
समुद्र जुआर माड़ि आसीब निकटे,
रक्ष्या नकरिबे केहि प्राणींकु संकटे।“
महापुरूषांनी पुन्हा स्पष्ट केले की जेव्हा गिधाड पक्षी नीलचक्रावर बसतात तेव्हा श्री जगन्नाथाच्या मंदिरातून वारंवार दगड पडतात. त्यावेळी महाप्रसादाच्या अर्पणात महाप्रभू जगन्नाथ दर्शन देणार नाहीत. अनेक वेळा महाप्रसाद मातीखाली गाडला जाईल. याचा अंदाज यावरून लावता येतो की, श्री जगन्नाथजींच्या मंदिराच्या परंपरेनुसार, जेव्हा भगवान जगन्नाथांना महाप्रसाद दिला जातो, तेव्हा श्री जगन्नाथजी महाप्रसाद देणार्या मुख्य पुजाऱ्याला दर्शन देतात. परंतु महान ऋषी अच्युतानंदांच्या इशाऱ्यानुसार जेव्हा गिधाड पक्षी किंवा गरुड पक्षी नीलचक्रावर बसेल, त्या वेळी भगवानच्या श्रीमंदिरातून दगड पडेल आणि महाप्रसाद अर्पण विधीत जगन्नाथ महाप्रभू दिसणार नाहीत. आणि यावेळी महाप्रभूंचा महाप्रसाद मातीत गाडला जाईल. तेव्हा, अच्युतानंद ऋषींनी हा इशारा म्हणून नमूद केला आहे की यावेळी समुद्र जमिनीपासून खूप उंचावर येईल आणि जल प्रलय येईल. जे आज पृथ्वीवर दिसत आहे. आणि हे संकेत जगन्नाथ प्रदेशात दिसले आहेत, आणि त्यानंतर मोठा विनाश होणार आहे. म्हणूनच ते एक संत या नात्याने सर्व मनुष्याला परिवर्तन होण्यासाठी प्रेरित करीत आहेत. या संदर्भात महापुरुषाने पुन्हा वर्णन केले आहे:-
“श्री धामरु एक बड़ पाषाण ख़सिब,
दिबसरे उल्लूक तार उपरे बसिब।
मो भुबने उल्कापात हेब घन घन,
जेउ सबु अटे बाबू अमंगल चिन्ह।”
महापुरुष अच्युतानंद जी महाराजांनी सांगितले की श्री जगन्नाथांच्या मुख्य मंदिरातून एक मोठा दगड पडेल आणि दिवसा दगडावर घुबड बसेल आणि या दोन्ही घटना मंदिरात यापूर्वीच घटित झाली आहे. आणि श्री जगन्नाथ क्षेत्रामध्ये भविष्यात पुन्हा पुन्हा उल्कापात होईल, हे आपल्याला महापुरुषांनी रचलेल्या अनेक ग्रंथांमधून कळते.
जय श्री सत्य अनंत माधव