धर्म संस्थापनेसाठी भगवान विष्णु जींचे दशावतार
श्रीमद्भागवत गीते मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात –
“यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान॰ सृजाम्यहम।। 4-7।।
परित्राणाय साधुना॰ विनाशाय च दुष्कृताम।
धर्म संस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे”।। 4-8।।
अर्थ:-
वरील श्लोकात स्पष्ट पणे श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले कि ‘जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, जेव्हा- जेव्हा अधर्म वाढते, तेव्हा-तेव्हा मी या पृथ्वी वर अवतार धारण करतो आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा विनाश करण्यासाठी प्रत्येक युगात मानव रूपात मी जन्म घेतो’.
गोस्वामी तुलसीदासजींनी त्यांच्या रामचरित मानस या ग्रंथातही म्हटले आहे की–
“जब –जब होई धरम की हानी,
बाढ़हि असुर अधम अभिमानी,
तब–तब धरि प्रभु विविध शरीरा,
हरहि दयानिधि सज्जन पीरा“
अर्थात:-
वरील श्लोकात तुलसीदासजी लिहतात कि जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, असुरीवृत्ती, दुराचार वाढतो, तेव्हा तेव्हा कृपानिधान भगवान विष्णु विभिन्न मनुष्य रूपात अवतार धारण करतात. आणि असुरांचा संहार करून साधू-संत आणि मनुष्य तसेच देवतांचा उद्धार करतात.
अशा प्रकारे भगवान विष्णूंनी वेगवेगळ्या युगात विविध अवतार धारण केले. त्यापैकी भगवान नारायणांनी सत्ययुगात ५ (पाच) अवतार घेतले
त्या ५ अवतारांची नावे आहेत: –
- मत्स्य अवतार
- कच्छप/कूर्म अवतार
- वराह/शुकर अवतार
- नरसिंह अवतार
- वामन अवतार
त्याचप्रमाणे त्रेतायुगात भगवान नारायणांनी दोन अवतार घेतले:
- राम अवतार आणि
- परशुराम/भृगुपती अवतार.
त्यानंतर द्वापर युगात भगवान नारायणांनी दोन अवतार घेतले:
- कृष्ण अवतार आणि
- हलधर/बलराम अवतार.
या कलियुगात भगवान नारायण एकूण तीन अवतार घेणार असल्याचे सांगितले जाते. पण त्यापैकी दोन अवतारांचे वर्णन या दशावतारात आहे. दशावताराचे वर्णन कवी जयदेवजी महाराजांचे ‘गीत गोविंद‘ आणि भागवत शास्त्र इत्यादी अनेक ग्रंथांत आढळते. त्या दशावतारांचे थोडक्यात वर्णन खाली दिले आहे:-
1. मत्स्य अवतार:-
महर्षी वेद व्यासजी महाराज श्रीमद भागवत महापुराणमध्ये भगवान श्री विष्णुं च्या मत्स्य अवताराबद्दल लिहितात:-
“आसीदतीतकल्पान्ते ब्राह्मो नैमित्तिको लयः।
समुद्रोपप्लुतास्तत्र लोका भुरादयो नृप।।
कालेनागतनिद्रस्य धातुः शिशयिषोर्बली।
सुखतो निःशृतान वेदात् हयग्रीवोन्धन्तिकेन्धहरत्।।
ज्ञात्वा तहदानबेन्द्रस्य हयग्रीवस्य चेष्टितम्।
दधार शफरीरूपं भगवान हरिरीश्वर।।
अतीतप्रलयापाय उत्थिताय स बेधसे।
हत्वासुरं हयग्रीवं वेदान् प्रत्याहरंधरिः।।“
(श्रीमद्भागवत महापुराण–मत्स्यावतारकथा–अष्टमः स्कन्ध– चतुर्विंशोऽध्यायः)
श्री जयदेवजी महाराज आपल्या गीत गोविंदात मत्स्य अवताराबद्दल लिहितात की:-
“प्रलय पयोधि जले धृतवानसि वेदम्,
विहित वहित्र चरित्रमखेदम्।।
केशव धृत मीन शरीर
जय जगदीश हरे।।
अर्थात –
मत्स्य रूपात प्रकट होऊन परमेश्वराने काय केले होते, हाच अर्थ वरील दोन श्लोकांत आढळतो. भगवान विष्णूने मनुच्या बोटीने मानवजातीला विनाशकारी प्रलयापासून वाचवले. त्यांच्याद्वारेच भगवान विष्णूंनी धर्म स्थापनेचे कार्य केले.
हयग्रीव या राक्षसाने वेद चोरले आणि खोल समुद्राच्या पाण्यात लपून बसला. भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून हयग्रीवाशी भयंकर युद्ध केले आणि वेदांचा उद्धार करून ब्रह्माजींना वेद परत दिले. भगवान विष्णूंनी मत्स्य रूपात सप्तऋषींचा उद्धार केला.
2. कच्छप/कुर्म अवतार:-
श्रीमद भागवत महापुराण मध्ये महर्षि वेद व्यासजी महाराजांनी कच्छप अवताराबद्दल लिहिले आहे की:-
“पृष्ठे भ्राम्यदमन्दमन्दरगिरि– ग्रावाग्रकण्ड्वयनानिद्रालो कमठाकृतेर्भगवतःश्वासानिलाः पान्तु वः।
यतसंस्कार कलानुवर्त्तन बशाद् बेलानिभेनायसां
जतायातमतंद्रितं जलनिधेर्नाद्यापि विश्राम्यति।।”
– (श्रीमद्भागवतपुराणम्/स्कंध: १२/अध्यायः १३)
अर्थात-
कूर्म अवतारात भगवान विष्णूंनी स्वतःला कासवाच्या रूपात दुधाच्या समुद्राच्या तळावर ठेवले आणि समुद्रमंथनासाठी आपल्या पाठीला मंदाराचल पर्वताचा आधार बनवले.
जेव्हा देवांना त्यांचा अधिकार राक्षसांपासून गमावण्याची भिती वाटू लागली, तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला जेणेकरून ते अमृत मिळवू शकतील जे त्यांना बलवान आणि अमर करेल. समुद्रमंथनात राक्षसांची मदत मिळावी म्हणून देवतांनी दानवांशी करार केला आणि सर्व मिळून त्यांनी समुद्रमंथन केले.
त्यांनतर जयदेवजी महाराजांनी आपल्या गीत गोविंदात कच्छप अवताराबद्दल लिहिले आहे की:-
“क्षितिरति विपुल तरे तव तिष्ठति पृष्ठे।
धरणीधारणकिण चक्र गरिष्ठे।
केशव धृत, कच्छप रूप,
जय जगदीश हरे।।“
म्हणजे जेव्हा पृथ्वीवर फक्त अंधार होता तेव्हा भगवान विष्णूने प्रकाश आणण्यासाठी कासवाच्या रूपात अवतार घेतला आणि पृथ्वीला आपल्या पाठीवर उचलून सूर्याच्या कक्षेत ठेवले.
3. वराह अवतार:-
श्रीमद भागवत महापुराण मध्ये महर्षि वेद व्यासजी महाराजांनी वराह अवताराबद्दल लिहिले आहे की:-
“तमालनील॰ सितदंतकोट्या
क्ष्मामुक्षिपंत॰ गजलीलयांग।
प्रज्ञाय बंध्धाजलयोंधनुवाकै– र्बिरंचि मुख्या उपतस्थुरीशम्।।“
कवी जयदेवजी महाराज त्यांच्या गीत गोविंद या ग्रंथात वराह अवताराबद्दल लिहितात की:-
“वसति दशन शिखरे धरणी तव लग्ना।
शशिनी कलंक कलेव निमग्ना।
केशव धृत, शूकर रूप,
जय जगदीश हरे।।“
अर्थात –
हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्राच्या तळाशी ओढून नेले. त्यानंतर पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने वराहाचे (वराह) रूप धारण केले आणि हजारो वर्षांच्या युद्धानंतर हिरण्यक्ष राक्षसाचा वध करून पृथ्वीचे रक्षण केले.
4. नरसिंह अवतार:-
श्रीमद भागवत महापुराण मध्ये महर्षि वेदव्यासांनी नरसिंह अवताराबद्दल म्हटले आहे की–
“दिबिस्पृशत्काय मदिर्घपी बरग्रीबोरुबक्षःस्थलमलुमध्यमम्।
चन्द्राशुगौरैश्चुरितं तद्वरुहैर्विष्वराभुजादिकशतं नखायुद्धम्।।
विष्वक् स्पुरन्तं ग्रहणातुरं हरिर्ब्यालो यथान्धन्धखु॰ कुलिशाक्षतत्वचम्।
द्वार्य्वर आपात्य ददार लीलया नखैर्यथाहिं गरुड़ों महाविषम्।।”
– भागवत पुराण –स्कंध 7-अध्याय 8: श्लोक 29
कवी जयदेवजीही त्यांच्या गीत गोविंदात नरसिंह अवताराबद्दल लिहितात–
“तब कर कमलवरे नखमद्भुतशृंगम्,
दलित हिरण्यकशिपु तनु भृंगम्।
केशव धृत, नरहरि रूप,
जय जगदीश हरे“
वरील पंक्तीचा अर्थ असा आहे की या अवतारात भगवान विष्णूने अर्धा पुरुष आणि अर्धा सिंह म्हणून आपला भक्त प्रल्हाद याला त्याच्या वडिलांच्या (राक्षस राजा– हिरण्यकशिपू) अत्याचारापासून वाचवले. हिरण्यकशिपूला वरदान होते की तो अशा प्रकारे मरण पावला पाहिजे की त्याला कोणत्याही मनुष्याने किंवा प्राण्याने, हवेत, पाण्यात किंवा समुद्रात, घरात किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, शस्त्रे किंवा शास्त्रांनी किंवा अस्त्राने मारले जाऊ नये. कोणीही मारू शकत नाही हे वरदान मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला अमर मानले. भगवान नरसिंह एका खांबातून बाहेर आले, आणि हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर बसवले आणि दाराच्या उंबऱ्यावर, भगवानांनी आपल्या लांब नखांनी त्याचे पोट फाडले.
5. वामन अवतार:-
महर्षि वेदव्यासजी महाराजांनी श्रीमद भागवत महापुराण मध्ये म्हटले आहे की –
“यत् तद् बपुर्भात बिभुषणायुधैरब्यक्तचिद् ब्यक्तमधारयन्धरिः।
बभुव तेनैब स वामनो बटुः संपश्यतेर्दिव्यगतिर्यथा नटः“
– श्रीमद् भागवत पुराण–अष्टमः स्कंधः अष्टादशोऽध्यायः श्लोक 12
“धातु कमंडलुजलं तदुरुक्रमत्स्य,
पादाबनेजन पवित्रतया नरेन्द्र।
स्वर्धुन्यभून्वभसि पतती निमार्ष्टि,
लोकत्रयं भगवतो बिशदेव कीर्ति।।”
–( श्रीमद्भागवत महापुराण/स्कंध ०८/अध्यायः २१)
कवी जयदेवजींनीही आपल्या गीता गोविंदात हाच पुरावा दिला आहे की –
“छलयसि विक्रमणे वलीमद्भुतवामन,
पदनखनीरजनित जन पावन,
केशव धृत, वामन रूप,
जय जगदीश हरे“
वरील दोन्ही मतांवरून असे सूचित होते की हा अवतार (एका हातात पाण्याचे कमंडल आणि दुसऱ्या हातात छत्री धरलेला बटू म्हणून चित्रित केलेला) इंद्राचे राज्य परत मिळवण्यासाठी घेतला होता.
राजा बली हिरण्यकशिपूचा नातू होता. त्यांनी आपल्या तपश्चर्येच्या जोरावर तिन्ही लोकांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. जेव्हा त्याची प्रतिष्ठा इंद्रावर भारी पडू लागली तेव्हा इंद्राने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भगवान विष्णूची मदत मागितली.
भगवान विष्णुंनी स्वतःला एका बटूच्या रूपात परिवर्तित केले आणि राजा बलीला विचारले की त्यांना तीन पायाच्या बरोबर एक जमीनीचा तुकडा हवा ज्यावर ते ध्यान करू शकतील . जेव्हा बलीने त्यांची विनंती मान्य केली, तेव्हा भगवान विष्णुंनी आपल्या अलौकिक शक्तीचा वापर करून, पहिल्या दोन टप्प्यात पृथ्वी आणि स्वर्ग काबीज केला आणि बलीला त्याच्या राज्यापासून वंचित केले.
पण राजा बळीने मोठेपणा दाखवला आणि देवाला त्यांचा तिसरा पाय त्यांचा डोक्यावर ठेवण्यास सांगितले. बळीचे औदार्य पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बळी राजाला पातळाचा अधिपती बनवले.
6. परशुराम अवतार:-
महर्षि वेदव्यासांनी श्रीमद भागवत महापुराण मध्ये म्हटले आहे की –
“अवतारे षोड़शमे पश्यन ब्रह्मद्रुहनृपान।
त्रिसप्तकृत्वः कृपितोनिःक्षत्रा मकरोन महीम्।।“
“आस्तेन्धद्यापि महेंद्रादै न्यस्तदण्डः प्रशान्तधीः।
उपगियमानचरितः सिन्दगन्धर्वचारणैः।।
एवं भृगुषु बिश्वात्मा भगवान हरिरीश्वरः।
अबतीर्य परं भारं भुबोन्धहन बहुशोनृपान्।।“
कवी जयदेवजी त्यांच्या गीत गोविंद या ग्रंथात लिहितात की –
“क्षत्रियरुधिरमये जगदपगतपापम्,
स्नपयसि पयसि शमितभवतापम्।
केशव धृत, भृगुपति रूप,
जय जगदीश हरे।“
दोन्ही श्लोकांमध्ये दिलेल्या कल्पनांचा अर्थ असा आहे की भगवान विष्णू त्रेतायुगात परशुराम/भृगुपती म्हणून अवतार घेतील. परशुराम (उजव्या हातात कुऱ्हाडीसह त्यांच्या रूपात चित्रित) भगवान विष्णूचा सहावा अवतार आहे. या अवताराच्या वेळी महाप्रभू परशुरामांनी क्षत्रियांच्या रक्ताने पृथ्वी मातेला शांत केले. वडिलांच्या मृत्यूने क्रोधित होऊन त्यांनी क्षत्रियांचा समूळ नाश करून 21 वेळा पृथ्वी मातेला क्षत्रिय-हीन केले होते.
7. राम अवतार:-
महर्षि वेदव्यासांनी श्रीमद भागवत महापुराण मध्ये लिहिले आहे की –
“ततः प्रजग्मुः प्रशमं मरुद्गणा,
दिशः प्रसेहुर्विमल नभोन्ध्धभवत्।
मही चकंम्पे न च मारुतो बबै,
स्थिर प्रभश्चाप्यभवत् दिवाकरः।।”
– रामायणम्/युद्धकाण्डम्/सर्गः १११
तसेच अध्यात्म रामायणात राम अवताराबद्दल जे लिहिले आहे, त्या ओळी खाली उद्धृत केल्या आहेत–
“एवं स्तुतस्तु देबेशो विष्णुस्तिदशपुंगबः।
पितामह पुरोगांस्तान् सरवलोकनमस्कृतः।।“
“अब्रबीत त्रीदशान सर्वान समेतान् धर्मसंहितान्।
सपुत्रपौत्रं सामात्यं समन्तिज्ञातिबांधवम्।।
हत्वा कुरंदूराधर्षं देवर्षीणां भयाबहम्।
दशवर्ष शहस्राणि दशवर्ष शतानि च।
वत्स्यामि मानुषे लोके पालयन् पृथिवीमिमाम्।।
रावणेन हृतं स्थानमस्काकं तेजसा सह,
त्वयाद्य निहतो दुष्टः पुनःप्राप्तं पदं स्वकम्।।“
कवी जयदेवजींनीही त्यांच्या गीत गोविंदात राम अवताराला स्थान देताना लिहिले आहे की–
“बितरसि दिक्षु रणे दिक्पतिकमनीयम्,
दशमुख मौलिवलिं रमणीयम्।
केशव धृत, रघुपति रूप,
जय जगदीश हरे।।“
वर लिहिलेल्या श्लोकांमध्ये भगवान राम हे विष्णूचे सातवे अवतार असल्याचे सांगितले आहे. या अवतारात भगवान रामांचा उल्लेख धनुष्यबाणांसह केला आहे. दशानन रावणाचा वध करून त्यांनी आपल्या पत्नी सीतेला बंधनातून मुक्त केले. त्रेतायुगातील धर्मसंस्थापनेचे हे एक प्रमुख कार्य होते.
या कामात त्यांना लक्ष्मण (त्यांचा एक धाकटा भाऊ) आणि हनुमान यांनी मदत केली. ही कथा रामायण या महान महाकाव्यात वर्णिली आहे. श्री रामांचे जीवन नैतिक उत्कृष्टतेचे आणि विवाहाच्या स्थिरतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ते जगातील सर्वोत्तम राजा होते. आपल्या प्रजेचे संगोपन करण्यात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नसावे. ते एक बलवान प्रतापी योद्धा आणि वीर होते . त्यांच्या नुसत्या नावाने दुष्ट लोक हादरायचे. त्यांचे आदर्श आचरण असे होते की पृथ्वीवरील त्यांचे राज्य एक आदर्श राज्य मानले गेले. म्हणूनच आजपर्यंत आपण आदर्श राज्याला ‘रामराज्य’ म्हणतो.
8. बलराम/हलधर अवतार:-
श्रीमद भागवत महापुराण मध्ये महर्षि वेदव्यासजी महाराजांनी बलराम अवताराविषयी लिहिले आहे की. –
“स आजुहाब यमुनां जलक्रीड़ार्थमीश्वरः।
निजं बाक्यमनादृत्य मभ रत्यापगां बलं।
अनागतां हलाग्रेण कुपितो बिचकर्ष ह।।
पापे त्वं मामवज्ञांय यन्नायासि मयान्ध्धहुता।
नेष्ये त्वां लंगलाग्रेण शतधा काम चारिणीम्।।
एवं निर्भत्सिता भीता यमुना यदुनंदनम्
उवाच चकिता वाचं पतिता पादयोर्नृप।।”
– (श्रीमद्भागवतपुराणम्/स्कन्धः १०/उत्तरार्धः/अध्यायः ६५)
तर कवी जयदेवजी महाराजांनी त्यांच्या गीत गोविंद या ग्रंथात हलधर अवताराचे वर्णन केले आहे की –
“बहसि बपुषि विशदे बसनं जलदाभम्,
हलहतिभीति मिलित यमुनाभम्।
केशव धृत, हलधर रूप,
जय जगदीश हरे।।“
वरील ओळींचा अर्थ असा की, द्वापर युगात जेव्हा भगवान बलरामजी आपल्या गोपी गोपाळांसह यमुनेच्या तीरावर लीला करत होते आणि ते सर्व यमुना नदीत स्नान करण्यास आले होते तेव्हा यमुना नदीने अहंकारात येऊन त्यांना स्नान करण्यास मनाई केली त्या वेळी प्रभू बलरामजींनी आपल्या नांगराने नदीत प्रहार करून यमुना नदीची दिशा बदलली आणि तिचे गर्व हरण केले.
9. बुद्ध अवतार:-
श्रीमद भागवत महापुराण मध्ये महर्षि वेद व्यासजी महाराज बुद्ध अवताराबद्दल लिहितात की–
“ततः कलै संप्रबृत्ते सम्मोहाय सुरदिक्षाम्।
बुद्धो नाम्नाजनसुतः कींकटेषु भविष्यति।।”
– (भागवत स्कंध १ अध्याय 6 श्लोक १९-२९)
पुढे कवी जयदेवजी महाराजांनी त्यांच्या गीत गोविंद या ग्रंथात भगवान बुद्धांच्या अवताराबद्दल लिहिले आहे की –
“निंदसि यज्ञबिधेरहह श्रुतिजातम्,
सदयहृदय दर्शित पशुघातम्।
केशव धृत, बुद्ध शरीर,
जय जगदीश हरे।।”
वरील पंक्तींमध्ये स्पष्ट केले आहे की भगवान बुद्ध भगवान विष्णूंचे नववे अवतार आहेत. कलियुगात, देवद्वेषिंना मोहित करण्यासाठी, ओडीसातील किंकट गावात अजन च्या पुत्राच्या रूपात त्यांनी जन्म घेतला होता . ( परंतु आवश्यक प्रमाण नसतांनाही त्यांनी नेपाल मध्ये जन्म घेतला असे म्हटले जाते).आधुनिक मान्यतेनुसार गौतम बुद्ध हेच बुद्ध अवतार आहेत. कलियुग संपण्याच्या काही वर्षे आधी त्यांनी अवतार घेतला आणि यज्ञातील पशुबळी प्रथा काढून धर्म स्थापनेचे कार्य केले.
10. कल्कि अवतार
श्रीमद भागवत महापुराणामध्ये महर्षि वेद व्यास जी महाराज कल्की अवताराबद्दल लिहितात की:-
“अथसै युगसंध्यायां दस्युप्रायेषु राजसु,
जनिता विष्णुयशसा नाम्ना कल्किर्जगत्पतिः।।”
बादैर्वि मोहयति यज्ञकृतोर्न्धदर्हान,
शूद्रान् कलौ क्षितिभुजो न्यहनिश्यदन्ते।।”
(-श्रीमद्दभागवत-प्रथमः स्कन्धःतृतीय अध्याय श्लोक-25)
कवी जयदेवजी महाराजांनी त्यांच्या गीत गोविंद या ग्रंथात कल्की अवताराबद्दल लिहिले आहे की –
“म्लेच्छनीबह नीधने कलयसि करवालम्,
धुमकेतु मिव किमपि करालम्।
केशव धृत, कल्कि शरीर,
जय जगदीश हरे।।”
भगवान विष्णूंनी ग्रहण केलेल्या संपूर्ण दशावतारांपैकी हा एकमेव कल्की अवतार बाकी होता.
या कलियुगात भगवान कल्कि धूमकेतूसारखे उग्र रूप धारण करतील. हातात मोठे खडग धरून, घोड्यावर स्वार होऊन ते दुष्ट, पापी, अत्याचारी, म्लेच्छ यांचा नाश करून पृथ्वीवर सत्ययुगासाठी धर्म संस्थापना करतील.
प्रामुख्याने वरील दशावताराचे वर्णन सर्वत्र केले आहे. हे वाचून काय मिळते याचे वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहे–
“शृण्वतां स्वकथां कृष्ण पूर्णश्रवणकीर्त्तनः।
हृद्यन्तस्थो ह्यभप्राणी सुदुतसताम्।।
जन्म गुह्य भगवतो य एतत् प्रयतो नरः।
सायं प्रातःर्गुणन भक्त्या दुःख ग्रामाद् बिमुखते।।“
(– श्रीमद्भागवतम् प्रथम स्कन्धः द्वितीयोऽध्यायः श्लोक-17)
या दशावताराचे वाचन आणि श्रवण करण्याने काय लाभ होतो त्याबद्दल श्री जयदेवजी पुढीलप्रमाणे लिहितात:-
“श्री जयदेव कवेरिदमुदित मुदारम्।
श्रृणु सुखदं शुभदं भव सारम्।
केशव धृत, दशविद्ध रूप,
जय जगदीश हरे।।“
अर्थात-
भगवान विष्णूच्या दशावतार स्तोत्राचे पठण करणे शुभ आणि सुखदायक आहे. हे वाचून किंवा श्रवण केल्याने परमेश्वराची कृपा होऊन भवसागर पार करून भक्तांचा उद्धार होतो . श्री जयदेवजी त्यांच्या “गीत गोविंद” या ग्रंथात दशावतार स्तोत्राच्या शेवटी लिहितात की:-
“वेदानुद्धरते जगन्ति वह भूगोलते मुद्बिभ्रते
दैत्यं दारयते बलिं छालयते क्षत्रक्षयं कुर्वते।
पौलस्त्यं जयते हलं कल्यते कारुण्यमातन्वते
म्लेच्छान्मूर्च्छयते दशाकृतकृते कृष्णाय तुभ्यं नमः ।।“
अर्थात-
हे, श्री कृष्ण! आपण मत्स्य रूप धारण करून प्रलय समुद्रात बुडालेल्या वेदांचा उद्धार केला, समुद्रमंथना वेळी महाकुर्म बनून पृथ्वी मंडळ आपल्या पाठीवर धारण केले, महावराहच्या रूपात अवतार घेऊन महासागरात बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार केला,नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपु दैत्याचा नाश केला, वामन रूपात बली दैत्याचे उद्धार केले, परशुराम रूपात क्षत्रिय जातीचा संहार केला, श्री राम अवतारात महाबली रावणावर विजय प्राप्त केला , श्री बलराम रूपात नांगराला शस्त्र रूपात धारण केले, भगवान बुद्ध रूपात दया आणि करुणा याचा प्रचार केला , तथा कल्कि रूपात अवतार घेऊन प्रभू पापींचा विनाश करतील. अशा प्रकारे दशावतार रूपात प्रकटीत होणाऱ्या महाप्रभु श्री कृष्ण भगवानांच्या चरणी मी कोटी कोटी नमन करतो.
भविष्यमालिका ग्रंथ चे रचयिता महापुरुष अच्युतानंद दासजी आपल्या ‘अष्टगुज्जरी ‘ ग्रंथ मध्ये लिहितात –
“भाव विनोदिया ठाकुर भक्त वत्सल हरि,
भक्त न्क पाईं कलेवर दश मुरती धरि।“
अर्थात-
प्रभू विष्णू हे भक्त वत्सल आहेत. ते भक्तांचे भाव ओळखतात आणि त्यांच्या भक्ती आणि प्रेमाखातर युगा युगांच्या भक्तांचे कल्याण हेतू आणि उद्धारासाठी दशावतार धारण करतात.
जय श्री सत्य अनंत माधव