अहंकारी मानव भविष्य मालिकेची उपेक्षा करतील.
महापुरुष श्री अच्युतानंद दास यांनी भविष्य मालिकेत लिहिलेली एक दुर्मिळ ओळ-
“मर मर कही सर बीमरिबे अच्युतारह किस गला।
चेतुआ पुरुषा चेतारे विहारे विहंता पुरुषा मला ।।“
अर्थात–
कलियुगाच्या शेवटच्या कालखंडात मानव समाजात दंभ, गर्व आणि अहंकार परम सीमेला पोहोचेल. मनुष्य त्याचा गर्व, अहंकार, पद प्रतिष्ठा आणि संपत्ती यामुळे मी माझे, तू तुझे, माझी मालमत्ता, माझा पैसा, माझे घर, माझी क्षमता, माझा अधिकार, माझे कुटुंब, माझी मुले, माझे कर्तृत्व, सर्व माझेच आहे, मीच सर्वस्व आहे असे म्हणत राहतील आणि अश्या मानसिकतेने ते धर्म, पावित्र्य, दक्षता व भविष्य मालिका सारख्या पवित्र ग्रंथांची उपेक्षा करतील.
जे प्रभुंचे भक्त आहेत, जे गोपी, कपी आणि तपी आहेत, ज्यांनी सत्य, त्रेता आणि द्वापार युगामध्ये धर्म–संस्थापनेच्या कार्यात प्रभुंना साथ दिली तेच भक्त मालिकेचे गहन रहस्य समजून घेऊ शकतील. अशा धार्मिक भक्तांची संख्या मर्यादित असेल.
अहंकारामुळे बहुतेक लोक धर्म, आचार , शास्त्र आणि वेदांचा मार्ग विसरतील. धर्मग्रंथ आणि पुराणांच्या लिखाणानुसार तोच मनुष्य ज्ञानी व शहाणा समजावा जो भगवंताचा निस्सीम भक्त आहे व जो सदैव चैतन्य स्वरूपाशी तन्मय आहे आणि ज्याने भगवंताच्या कमल चरणी स्वतःला समर्पित केले आहे जो भविष्य मलिका आणि वेदांच्या मार्गाचे अनुसरण करतो. असे ज्ञानी भक्त लोकं भविष्य मालिकेचा इशारा समजतील आणि सावध व जागृत होऊन अनंतयुगाच्या कार्यात हातभार लावतील. हे लोकं येणार्या सत्ययुगाचे बीज बनतील, आणि पुढील युगात जाण्यास लायक असतील.
जय जगन्नाथ