एक कोटी जनसंख्ये मध्ये फक्त एकच भक्त असेल
थोर पुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-
कलियुगाच्या शेवटी भक्त मंडळी भगवंताला कसे जाणणार ?
भक्तांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर श्री अच्युतानंद दास मलिकाद्वारे देतात…
संसार मध्यरे केमन्त जानिबी नरअंगे देहबही।
गता गत जे जुगरे मिलन समस्तंक जणको नाही।।
मानवी शरीराच्या मर्यादे मुळे मनुष्यास जगत्पती श्री विष्णूंना ओळखता येणे अति कठीण आहे. त्यामुळे भक्ताला आलेल्या व्यक्तीशः अनुभवाच्या आधारेच श्री जगन्नाथास जाणणे शक्य असेल.
या विषयावर महापुरुष श्री अच्युतानंद दास मालिकेमध्ये लिहितात…
अनुभवे ज्ञान प्रकाश होइबो अनुभव करमह।
भविष्य विचार तेणकी कहिबी ज्ञाने नही तरपर।।
अर्थात –
भक्तीच्या आधारेच भगवंतांचा अनुभव भक्तांना होईल . श्री माधव महाप्रभू हे साक्षात भगवान मधुसूदन आहेत, हे अश्या भक्तांना उमगेल. महापुरुष श्री अच्युतानंद दास भविष्य मालिका मध्ये लिहितात की प्रत्येकजण भगवंताच्या कृपाछत्रा खाली येण्या इतका सुदैवी नसेल. प्रभूच्या अवतारा बरोबरच देवी देवताही मनुष्य रूपात अवतरतील. ज्या भक्तांचे पूर्वजन्म सुकृत उत्तम असेल आणि जे दृढ निश्चयाने परमेश्वराची कृपा प्राप्त करण्याची आणि त्याचा प्रत्यक्ष सहवासाची आस धरतील अश्या भाग्यवान भक्तांनाच परमेश्वराचा सहवास मिळेल. आणि हेच ते श्री विष्णूंच्या गो – लोक निवासी भक्त वेगवेगळ्या युगांमध्ये, प्रत्येक वेळी परमेश्वराच्या आगमनाची वार्ता आणि साथ देण्यासाठी परत परत जन्म घेत असतात. असे हे विष्णू भक्त , येणाऱ्या सत्य युगात श्री माधव महाप्रभूच्या अपरिमित कृपेचा आनंद घेण्यास पात्र असतील.
कोटि के गोटिये जाहन्ति सेरस तिरिसे सहस्त्र गणासही।
महिमा प्रकाश निश्चय रामदास आनेमो कोहून्ति नाही।।
अर्थात –
कोटी लोकां मध्ये एखाद्याच भक्ताची दृढ निष्ठा व भक्ती असेल कि जो भगवान श्री हरीच्या वर्तमानात असलेल्या मनुष्य रूपावर श्रद्धा ठेवेल. समाजातील इतर लोकांच्या प्रखर टीकेला आणि तिरस्काराला सामोरे जात परमेश्वराचा शोध घेण्याची अचाट ध्येय, हिम्मत आणि जिद्द अश्या मोजक्या भक्तां मध्येच असेल. केवळ हेच मोजके भक्त येण्याऱ्या काळाचे गांभीर्य समजू शकतील. हे सर्व भक्त सरतेशेवटी भगवंतांच्या आश्रयाला जातील आणि श्री हरीचें सान्निध्य प्राप्त करून धन्य होतील. हे केवळ प्रभूंच्या प्रति असण्याऱ्या निस्सीम व निरागस दृढ भक्ती द्वारेच शक्य होऊ शकते आणि दुसऱ्या कशाने नाही.
जय जगन्नाथ