कलियुगाच्या समाप्तीचे चिन्ह
कलियुग संपुष्टात आले आहे आणि हे सत्य सिद्ध करण्यासाठी महापुरुष पंचसखांनी भविष्य मलिका ग्रंथात पुढीलप्रमाणे अनेक लक्षणे स्पष्टपणे वर्णन केली आहेत:-
(क). मानवी सभ्यतेत होत असलेले बदल:-
- मानवी समाजातील अनेक स्त्रिया आणि पुरुषांमध्ये निर्जंतुकीकरणाचे दोष दिसतील ज्यामुळे मुले जन्माला येणार नाहीत.
- स्त्री आणि पुरुष दोघांचे लिंग बदल शक्य होईल आणि बरेच लोक त्यांचे लिंग बदलतील.
- कामना, वासना, स्वार्थ आणि पैशाच्या लोभामुळे मुले आपल्या आईवडिलांची हत्या करतील.
- समाजातून एकत्र कुटुंबाची परंपरा नामशेष होईल, केवळ भाऊच वेगळे घरात राहणार नाहीत तर पती–पत्नीही वेगळ्या घरात राहतील.
- मुले वृद्ध आई–वडिलांना घरातून हाकलून लावतील आणि वृद्ध आई–वडील एकटे किंवा वृद्धाश्रमात राहतील.
- मनुष्यप्राणी सदैव आजाराने ग्रस्त राहून औषधाच्या मदतीने जगतील.
- समाजात मांसाहारी, मद्यपी, तंबाखू सेवन करणारे आणि अंमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांची संख्या खूप वाढेल.
- जगात गर्भपात आणि भ्रूणहत्या ही पापे मोठ्या प्रमाणात वाढतील.
- जगात दुसऱ्या पत्नीची संख्या खूप वाढेल.
- पती–पत्नीमध्ये शुद्धता राहणार नाही.
- मानवी समाज देवांची पूजा करणार नाही.
- मुले त्यांच्या मृत पालकांना पिंड दान देणार नाहीत.
- मुले पालकांच्या अंत्यसंस्कारात हातभार लावणार नाहीत.
- विधवा महिला देखील अंतिम संस्कार करतील आणि पिंड दान देतील.
- पुरुष आणि पुरुष यांच्यात विवाह होईल.
- स्त्री आणि स्त्री यांच्यात विवाह होईल.
- भाऊ आणि बहिणीमध्ये विवाह होईल.
- वडील कुठेतरी आपल्या मुलीशी चुकीचे संबंध ठेवतील.
- पुरुष म्लेच्छ वस्त्र परिधान करतील आणि स्त्रिया अतिशय कामुक आणि म्लेच्छ रूप परिधान करतील.
- पुरुष लोक देखील मुलांना जन्म देतील.
- पुरुष डोक्याच्या वरच्या भागावर केस ठेवतील आणि कानाच्या उर्वरित भागातून केस कापतील.
- मामी आणि भाचा यांमध्ये विवाह होईल.
- काकू आणि पुतण्याचे लग्न होईल.
- सासू आणि जावई यांच्यात प्रेम असेल.
- मामा आपल्या भाचीसोबत स्थायिक होतील.
- प्रत्येकजण पाश्चात्य संस्कृती अंगीकारेल आणि त्यानुसार पोशाख करेल.
- विवाहित महिला कपाळावर सिंदूर आणि हातात बांगड्या घालणार नाहीत.
- कलियुगात कोणताही मनुष्य आपले संपुर्ण आयुष्य जगु शकणार नाही.
- गीता, भागवत, शास्त्रे, पुराणे सोडून मानव समाज कामशास्त्राचा अभ्यास करेल.
- लोक आई तुलसीजीची पूजा करणे बंद करतील.
- लोक ग्रामदेवी/कुलदेवीची पूजा करणे बंद करतील.
- समाजात खोटे बोलणाऱ्यांची संख्या खूप वाढेल.
- पापी, भ्रष्ट आणि अज्ञानी लोकांना समाजात मोठा सन्मान मिळेल.
- लग्नात उच्च–नीच, जात–पात, धर्म, जात असणार नाही.
- तरुण पुरुष मोठ्या स्त्रियांशी लग्न करतील.
- ज्ञानी माणसे गायत्री मंत्र सोडून जादूटोणा वगैरे विद्या शिकतील.
- संरक्षक भक्षक बनतील. (गरुड धान्य खाईल.)
- जगातून वेदमार्गाचा नायनाट (उध्वस्त) होईल.
- स्त्रिया उघडे केस घेऊन फिरतील. तरुणीला नग्न होऊन तिचे शरीर दाखवणे आवडेल.
- स्त्रिया आपले शरीर विकून पोट भरतील.
- कलियुगाच्या शेवटी राजे राज्य करणार नाहीत.
- मानव एकादशीचे व्रत ठेवतील पण मांसाहार करतील.
- काही लोक निर्माल्य (जगन्नाथजींचा महाप्रसाद) सोबत दारू आणि मांस खाऊ लागतील.
- अवेळी लोक आहार, विहार आणि झोप घेतील .
- पुरुषासोबत अकाली संभोग केल्याने मूल गर्भातच मरण पावेल.
- मुले आणि मुली गुप्तपणे गर्भ नष्ट करतील.
- पुरुष दुसऱ्याच्या स्त्रीचे अपहरण करतील.
- जगातील सर्व कुटुंबांमध्ये अशांततेचे वातावरण दिसून येईल.
(ख). निसर्ग आणि पंचभूतात होणारे बदल:-
- कोकिळा मध्यरात्री गाणार.
- अकालीच आंब्याच्या झाडाला फुले येण्यास सुरवात होईल.
- कडुलिंबाच्या झाडामध्ये अवेळी फुले व फळे येण्यास सुरुवात होईल.
- वेगवेगळ्या झाडांमध्ये, नियमानुसार जी फळे आणि फुले येतात त्यापेक्षा वेगळे फळ फुल येईल.
- बांबूच्या झाडांमध्ये तांदुळ उगवेल.
- शेतातच धान्यावर अळीचा प्रादुर्भाव होईल.
- काही ठिकाणी जास्त आणि कमी उत्पन्न मुळे पिकांच्या उत्पादनात घट होईल.
- अनेक ठिकाणी दुष्काळ पडेल.
- वीज पडून अनेक माणसे आणि प्राणी मरतील.
- गौमातेची अकाल मृत्यु होईल.
- मानव आणि प्राण्यांमध्ये अज्ञात रोगांचा प्रसार सुरू होईल.
- पृथ्वीवर 64 प्रकारचे साथीचे रोग पसरतील.
- ऋतू अकाली बदलतील आणि केवळ 13 दिवसांत 6 ऋतूंचा अनुभव होईल.
- नद्यांना अवकाळी पूर येईल.
- सूर्याची किरणे 10 पट अधिक तीव्र असतील.
- अवेळी धुके असेल (म्हणजे दिवसभरात).
- वादळे पुन्हा पुन्हा येतील आणि वादळाच्या जोरामुळे समुद्र पुन्हा पुन्हा किनाऱ्याच्या सीमेचे उल्लंघन करेल.
- वाळवंटात पूर येईल.
- अतिवृष्टीमुळे डोंगराच्या माथ्यावरही पूर येईल आणि त्यामुळे माणसे व प्राण्यांचा मृत्यू होईल.
- जलचर आणि सागरी प्राणी खूप मरतील.
- अनेक वन्य प्राणी शहरात येऊन मानवाचे नुकसान करतील.
- सूर्याच्या उष्णतेमुळे उत्तर आणि दक्षिण मेरूचा बर्फ वितळण्यास सुरुवात होईल.
- मोठ्या जंगलात आगीमुळे करोडो वन्य प्राणी मरतील.
- प्रत्येक महिन्यात, दररोज, पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवतील.
- दिवसा कोल्हे ओरडतील.
- कोंबड्याच्या मुकुटाचा रंग लाल ते पांढरा होईल.
- वैशाख महिन्यातही कमळ फुलणार.
- चारही दिशांना धूर दिसू लागेल.
- पृथ्वीच्या सपाट आणि डोंगराळ भागात ढग फुटतील आणि पाऊस पडेल.
- दर महिन्याला पृथ्वीच्या कोणत्या ना कोणत्या ठिकाणी वादळे, चक्रीवादळे, धुळीची वादळे इ. येतील.
- अनेक नवीन आणि सुप्त ज्वालामुखी देखील पृथ्वीवर जागृत होतील.
(ग). ग्रह आणि नक्षत्रांमध्ये होणारे बदल:-
- चंद्राची किरणे अस्पष्ट दिसतील.
- सूर्याची किरणे खूप तेजस्वी असतील.
- पुन्हा पुन्हा 13 दिवसाचे पक्ष ( पंधरवाडे) येतील.
- आकाशातून पुन्हा पुन्हा उल्का पडतील.
- बर्याचदा, अमावस्या आणि संक्रांती एकाच दिवशी एकत्र येतील.
- बर्याचदा, पौर्णिमा आणि संक्रांती एकाच दिवशी एकत्र येतील .
- अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण एकाच पक्षाच्या अंतरात दिसेल.
- अकाली सुर्य व चंद्र च्या चारही बाजुला वलय (मंडल) दिसेल.
- वारंवार ग्रह आणि नक्षत्रांमध्ये अनैसर्गिक हालचाली दिसून येतील.
- सूर्याची किरणे 10 पट अधिक तीव्र होतील.
- 11.ग्रहाच्या हालचालींच्या गतीमध्ये वारंवार बदल दिसून येतील.
- ग्रह आणि नक्षत्र परिस्थितीशी सुसंगत राहणार नाहीत.
- सूर्य आणि चंद्र सात दिवस आणि सात रात्री दिसणार नाहीत आणि अंधार होईल.
- नंतरच्या काळात, नवीन सूर्य, नवीन चंद्र आणि नवीन नक्षत्र भगवान कल्किद्वारे स्थापित केले जातील.
(घ). आध्यात्मिक बदल:-
- अनेक मंदिरांवर विजांचा कडकडाट होईल.
- काही ठिकाणी विज पडून मंदिराचा ध्वज जळेल.
- विविध मंदिरांमधून चोरी आणि लूटमार अशा प्रकारची असेल की मंदिरांमधून मूर्ती देखील चोरीला जातील.
- मंदिराच्या आतही लोक बलात्कार करतील.
- मांसाहार आणि मद्य सेवन केल्यानंतर पुजारी मंदिरांमध्ये पूजा करण्यास सुरुवात करतील.
- मांसाहार आणि मद्य प्राशन करून लोक मंदिरांमध्येही प्रवेश करतील.
- विविध मंदिरे आणि अध्यात्मिक ठिकाणी कोणतेही आध्यात्मिक वातावरण असणार नाही.
- देवता असतानाही मंदिरांचे संरक्षण आणि देखभाल केली जाणार नाही.
- अनेक ठिकाणी देवतांची पूजा केली जाणार नाही.
- या सर्व पापकर्मांमुळे देवी–देवता गाव सोडून दूर जातील.
(इ). गुरु, शिष्य आणि साधू, संत यांची व्यक्तिरेखा :-
- बरेच लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी गुरु परंपरा सुरू करतील.
- गुरुंना शास्त्र पुराणाचे ज्ञान नसेल.
- तंत्र साधना केल्याने काही लोक स्वतःला गुरु म्हणवून घेतील.
- जे भूत प्रेत- पिशाच व दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळवून देतील त्यांना समाजात मोठे गुरू म्हटले जाईल.
- गुरु परंपरेत मांसाहार आणि दारू पिण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
- ज्यांना सवर्ण म्हटले जाते ते लोक हातात जाळे आणि काठ्या घेऊन मासेमारी करू लागतील आणि कसायाचे काम करतील.
- ब्रह्मचारी लोक ब्रह्मचर्य पाळणार नाहीत.
- वडिलांनी आणि आईने दिलेले नाव बदलून, त्यात संत, स्वामीजी, दास, महाराज इत्यादी पदव्या जोडून ते स्वतःला ठाकूर/महापुरुष म्हणतील.
- भगवा वस्त्र परिधान करून अनेक लोकं स्वतःला गुरु म्हणवून घेतील.
- जंगले कापून आणि बिलाची पूजा करून, ते देवाचा स्वप्न आदेश म्हणत खोटा गौरव पसरवतील.
- ज्यांना गुरू म्हटले जाते ते लोक शिष्याशी लग्न करतील आणि तिला आपली पटराणी म्हणतील.
- गुरु लोक स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घोषित करतील.
- बनावट शंख- चक्र दाखवून आणि स्वतःला भगवान कल्कि म्हणवून घेऊन ते लोकांना लुटत राहतील.
- स्वतःला गुरू म्हणतील पण शिष्याच्या पत्नीला लोभ दाखवून पळवून नेतील.
- स्वत:ला गोपाल आणि शिष्याला गोपी म्हणवून घेऊन पाखंडी लोकं त्यांची काम वासना पुर्ण करतील .
- स्वतःला भगवान नारायण म्हणवून शिष्याला मोक्ष मिळवून देण्याचा लोभ देऊन गुरु शिष्याला चरणसेवा करायला लावतील.
- पाखंडी डोक्यावर जटा बांधून स्वतःला संत म्हणवून लोकांना लुटत राहील.
- निरक्षर अशिक्षित आणि आळशी लोक स्वतःला देवाचे सेवक म्हणतील आणि खांद्यावर पवित्र धागा( जनेऊ) घालून लोकांची फसवणूक करू लागतील.
- गुरु श्रीमंत शिष्य निवडून गोळा करतील.
- स्वतःला गुरू म्हणवून घेणारे पाखंडी लोकं शिष्य आणि शिष्यांच्या संपत्ती उपभोग करून आरामात राहतील.
- पाखंडी लोकं शिष्याकडून धन, सोने, चांदी इत्यादी धातूंची दक्षिणा घेऊन वैकुंठात स्थान देण्याचे खोटे नाटक करतील.
- सुंदर स्त्रियांना नानाविध प्रलोभने देऊन, त्यांना शिष्य बनवून आपली काम–वासना पूर्ण करतील.
अशा प्रकारे, युगाच्या शेवटी, जगात अनेक बदल होतील आणि व्यतिक्रम (उल्लंघन) दिसून येतील. भविष्य मलिका मध्ये, महापुरुष पंचसखांनी सांगितले आहे की कलियुग संपल्यावर ही सर्व लक्षणे दिसून येतील. आज जवळजवळ सर्व लक्षणे दिसू लागली आहेत. यापैकी केवळ काही लक्षणांचे प्रमाण मिळणे बाकी राहीले आहे . म्हणून आपण असे म्हणू शकतो की कलियुग पूर्णपणे संपले आहे आणि हा संगम युग किंवा युग संधीकाळ चालू आहे.
जय श्री सत्य अनंत माधव