कलियुग समाप्ती आणि प्रलय पूर्व प्रतिकूल हवामान
महापुरुष श्री बलराम दास ह्यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्य-
धार्मिक ग्रंथांनुसार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पाण्याचे निसर्ग चक्र अनियमित असेल. अयोग्य वेळी, अयोग्य प्रमाणात पाऊस पाणी होईल. मनुष्यांस अति तीव्र पावसाचा सामना करावा लागेल ज्यामुळे लोकांना रोग, दुष्काळ, उपासमारीस मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागेल.
“अदिने बर्षा हेबो काल नदी बढिबो, अपालकों होई नासजिबे महि अज्ञानी होईबे जन।
इंद्र जे अन्याय करिबो जल जे कठोर होइबो, बहुत प्रमाद पड़ीबो केही काहू के ना मानिबे।”
अर्थात –
अवकाळी मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढेल, नद्यांना प्रचंड पूर येतील, त्यात शेत जमिनी उद्ध्वस्त होतील व शेतकऱ्यांची दैना होईल, त्यांना अति नुकसान सहन करावे लागेल आणि त्यांची मेहनत आणि पैसा दोन्ही हि वाया जातील. मायेच्या प्रभावाखाली असलेली आणि अज्ञानाच्या अंधारात असलेली लोकं हि भीषण परिस्थिती हतबल होऊन बघत राहतील आणि परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहत राहतील.
कलीयुगाच्या शेवटी इंद्र देव, श्री हरींनी आखून दिलेल्या निसर्ग नियमांचे आणि धोरणांचे वारंवार उल्लंघन करतील आणि एक प्रकारे पृथ्वीवर काहीसा अन्यायच करतील. शेती व अन्नधान्याचा वारंवार होण्याऱ्या नाशाने जगभर महागाई वाढत जाईल, अन्न धान्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील. अशी परिस्थिती जगातील जवळपास सर्वच देशां मध्ये पाहायला मिळेल. सरकार प्रशासनाला महत्त्व देणार नाही. प्रचंड महागाईमुळे सरकारी यंत्रणेला जनतेच्या रोषास तोंड द्यावे लागेल. सर्वत्र जन आक्रोश होईल. लोक उपासमारीने कायदा हातात घेतील व कोणीही कोणाचे ऐकणार नाही, अनेक देशांमध्ये परिस्थिती तणाव खाली राहील. नजीकच्या भविष्यकाळात भारत ही अश्या आपत्ती पासून दूर राहू शकणार नाही. भारतालाही तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागेल. एक काळ असा होता की श्रीमंत अथवा सधन लोकं पैशाच्या ताकदीने सुखी रहात असत . पण येथून पुढे काळ बदलत आहे, सनातन धर्माचे पालन करणारे भक्तच सुखाने जीवन व्यतीत करताना दिसतील. अमाप संपत्ती असण्याऱ्या वर्गाला त्यांच्या संपत्तीचा काडीमात्र उपयोग करता येणार नाही. कारण सत्य युगाची पहाट उजाडताच त्याला अनुकूल अश्या धार्मिक शुद्ध शक्तीचा प्रभाव विश्वभर हळू हळू पसरू लागतो. म्हणून ह्या सांप्रत काळी प्रत्येकाने सनातन धर्माच्या मार्गावर चालावे. सत्य सनातन धर्मासाठी कार्य करावे आणि पूर्ण भक्तीभावाने श्री हरींच्या चरणी स्वतःला पूर्णपणे समर्पित करावे.
जय जगन्नाथ