कुठेही शांतता राहणार नाही, सर्वत्र हाहाकार होईल.
महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या भविष्य मलिका मधील एक दुर्मिळ ओळ आणि तथ्य–
मलिकामध्ये महायुद्धाच्या वेळी संपूर्ण जगाची परिस्थिती आणि कोणते देश भारताच्या बाजूने अथवा विरोधात असतील, त्याची माहिती अशा प्रकारे वर्णन केलेली आहे.
“पूर्ब पश्चिम रंग बर्न हेब गिरी मालाचम कीव लोहा,
कहना मानो भारोते भूलिब रूसिया शासन हेबो।“
अर्थात-
जगाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व देशांमध्ये घनघोर युद्ध होईल. जगभर चौफेर दिवाळीच्या फटाक्यांसारखे स्फोट होताना दिसतील. सर्वत्र आक्रोश होईल. कुठेही शांतता राहणार नाही. युद्धामुळे पूर्व आणि पश्चिमेकडील आकाशाचा रंग लाल होईल. त्याचवेळी भारताचे पाकिस्तान आणि चीनशी भीषण युद्ध होईल. एक वेळ अशीही येईल जेव्हा भारतावर काही काळ रशियाचे राज्य असेल.
काही काळासाठी, रशिया भारताची शासन व्यवस्था आणि भारताच्या सैन्याला पूर्ण मदत करेल. रशियाचा पाठिंबा सदैव भारताला असेल. भारताच्या प्रत्येक समस्येत रशिया भारताला पूर्ण पाठिंबा देईल. भविष्य मालिकेची वाणी हि ब्रह्म वाणी आहे. त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टी भविष्यात लोकं पूर्ण होताना पाहतील.
महापुरुष पुढे असे लिहितात…
महायुद्धाच्या वेळी जगातील सर्व मोठे देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मन, जपान, भारत, चीन, रशिया हे दोन परस्पर विरोधी गटांमध्ये विभागले जातील. प्रत्येकजण आपापल्या गटाला समर्थन देईल. तिसर्या महायुद्धापूर्वी ही सर्व बदललेली राजकीय समीकरणे आणि रणनीती प्रत्येकजण जाणू शकतील. रशिया, जपान, जर्मनी, फ्रान्स असे देश युद्धात भारताच्या समर्थनार्थ येतील. रशिया भारताला मोठ्या प्रमाणात सहकार्य करेल . फ्रान्सही भारताला पूर्ण क्षमतेने सहकार्य करेल. युद्धाच्या अंतिम समयी, भगवान कल्की द्वारे भारताचा विजय निश्चित होईल आणि भारत विश्वविजेता म्हणून उदयास येईल.
“जय जगन्नाथ”