कोणत्या पाप कर्माद्वारे कलियुगाचे अधःपतन होईल?
चतुर्युगाच्या गणनेनुसार कलियुगाला 4,32,000 वर्षांचे भोग असावे. परंतु मनुष्याने केलेल्या पापकर्मांमुळे युगाची आयु क्षय झाली आहे. आणि या कलियुगाची आयु ‘ भविष्यमालिका ग्रंथानुसार ज्या ३५ प्रकारच्या पापांमुळे आयु कमी झाली आहे त्या सर्व पापांचे आणि वर्षांचे वर्णन खालील प्रमाणे आहे:
- पितृ हत्या
- मातृ हत्या
- स्त्री हत्या
- बालहत्या
- गोहत्या
- ब्रह्म हत्या
- भ्रूणहत्या
- मातृ हरण
- भगिनी हरण
- कन्या अपहरण
- भ्रातृ वधूचे अपहरण
- विधवा स्त्री अपहरण
- पर स्त्रीअपहरण
- महिला अपहरण
- गर्भवती महिलेचे अपहरण
- कुमारी हरण
- पशु हरण
- भूमी हरण
- दुसऱ्याच्या धनाची चोरी
- म्लेच्छा (पापी) वेशभूषा धारण
- अभक्ष भक्षण
- अगम्य मध्ये प्रवास
- अतिनैराश्य
- कुटुंब वैराग्य
- मित्रासोबत फसवणूक
- विश्वास घात
- खालच्या जातीशी प्रेम करणे
- नग्न स्नान करणे
- नग्न झोपणे
- खोटे बोलणे
- धर्मग्रंथांची निंदा करणे
- गौचर भुमी , स्मशानभूमी अधी ग्रहण
- तुळशी मातेची पूजा न करणे
- भगवान श्री विष्णू मूर्तीची पूजा न करणे
- आई- वडिलांची भक्ती न करणे
या सर्व पापांमुळे कलियुगाची आयु क्षय होऊन 5000 वर्ष इतकाच भोगकाळ राहील असा उल्लेख महापुरुष अच्युतानंद दासजी यांनी “उद्धव भक्ती प्रदायिनी” या ग्रंथात लिहिले आहे. या ग्रंथात उद्धव आणि महाप्रभु श्री कृष्ण यांच्या मध्ये संवाद होतो कि कलियुगाच्या अंतिम समयी काय- काय घडणार आहे याबाबतीत उद्धवजींच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्री कृष्णांनी पुढील श्लोका द्वारे स्पष्ट केले आहे –
“चारि लक्ष अटे बतिस सहस्र आयुष ए कलियुग।
पाप बढिबारु आयु कटिजिब अलप होइब भोग।।“
(‘उद्धव भक्ति प्रदायिनी‘- अच्युतानंद)
अर्थात-
कलियुगाची आयुचा भोग काळ 4,32,000 वर्षांचा क्षय होऊन केवळ 5000 वर्ष इतका असेल.
द्वापर युगात, भगवान श्री कृष्णांचे आपले प्रिया सखा अर्जुनासोबत कथन होत असते, आणि त्यावेळी अर्जुन महाप्रभू श्री कृष्णजींना कलियुगाचा अंत, धर्म संस्थापना आणि भगवान कल्कि अवतारा संबंधी प्रश्न करतात. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे घडणाऱ्या बऱ्याच लिलांचे वर्णन करतात आणि महापुरुष अच्युतानंद जी महाराजांनी त्यांच्या ‘चउषठि पटल‘, ‘नील सुंदर गीता‘ इत्यादी अनेक ग्रंथांमध्ये त्याच गोष्टींचे वर्णन केले आहे.
अर्जुनाने महाप्रभू श्री कृष्ण ला प्रश्न विचारले की ‘जर कलियुगाची आयु 4,32,000 आधीच ठरली होती तर अश्या कोणत्या पापांमुळे कलियुगाचा भोग काळ क्षय होऊन 5000 वर्षे बनेल? हे प्रभू! कृपया दया करून आम्हाला त्या पाप कर्मांबद्दल सांगा’.
तेव्हा भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कोणत्या पापकर्मामुळे कलियुगात किती वर्षे क्षय होतील याचे वर्णन करतात:
* खोटे बोलणे: 5000 वर्षे
* गंगेत नग्न स्नान करणे: 12000 वर्षे
* पत्नीशिवाय अन्यत्र प्रीती करणे: 30000 वर्षे
* मित्राचा विश्वासघात करणे: 6000 वर्षे
* महाविष्णुजींच्या मूर्तीची पूजा न करणे: 17000 वर्षे
* माता तुळशी देवीची पूजा न करणे: 5000 वर्षे
* अतिथीची सेवा न करणे: 6000 वर्षे
* भावा सोबत द्रोह करणे: 40000 वर्षे
* अभक्ष्य भक्षण करणे: 8000 वर्षे
* दुसऱ्याचे पैसे जबरदस्तीने घेतल्याने (धन हरणे): 10000 वर्षे
* गोहत्येचे पापकरणे: 100000 वर्षे
* दानाचा चुकीचा उपयोग केल्याने: 14000 वर्षे
* विधवा स्त्रियांसोबत चुकीचे व्यवहार करणे: 24000 वर्षे
* जीव हत्या करणे: 11000 वर्षे
* जात, धर्म, वर्ण या नियमांकडे दुर्लक्ष करून, प्रीती करणे: 12000 वर्षे
* भ्रूणहत्येच्या पापामुळे: 7000 वर्षे
* स्त्रियांच्या हत्येच्या पापामुळे: 32000 वर्षे
* गौ चारण आणि शमशान भूमी हरणाच्या पापांमुळे: 40000 वर्षे
* मातृ हरण च्या पापांमुळे: 5000 वर्षे
* विश्वासघाताच्या पापांमुळे: 40000 वर्षे
* मातृ-पितृ हत्या आणि अनन्य पापांमुळे: 3000 वर्षे
अश्या सर्व पापांमुळे कलियुगाची भोग आयु 4,32,000 पासून 4,27,000 वर्षांची आयु क्षय होऊन 5000 वर्षे इतकाच भोग असेल.
पंचसखांद्वारे नमूद केलेले विचार विभिन्न शास्त्र आणि मालिका ग्रंथ मध्ये नमूद केलेले सत्य यांचे असे प्रमाण मिळते कि अनेक पाप कर्मांमुळेच कलियुगाची आयु क्षय झाली आहे. आणि या कलियुगाची आयु ही 5000 वर्षे भोग असणार आहे. सोबतच शास्त्र – पुराणात वर्णित गणनेनुसार वर्तमान कलियुगाचे 5,125 वर्ष चालू आहे अर्थात कलियुग संपूर्णपणे समाप्त झाले आहे.
जय श्री सत्य अनंत माधव