गाव आणि शहरातुन भाविकांचा एकत्रीकरण होणार आहे
महापुरुष अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या मलिकाच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये–
“भकत मोधन, भकत जीबन, भकत मोगला हार,भकतंक पाईं, कलिजुग शेसे, हेबि कल्कि अबतार।“
अर्थात –
भगवान महाविष्णू द्वारे कथित अमृतवाणी महापुरुष मालिकेत या प्रकारे लिहतात कि, माझे भक्त हेच माझे धन, माझे भक्त हेच माझे प्राण आणि माझे भक्त हेच माझे गळ्यातील हार म्हणजेच माझे सर्वस्व आहे. केवळ भक्तांच्या उद्धारासाठीच कलियुगाच्या अंतिम समयी ओरिसाच्या पावन धरतीवर मी कल्की अवतार धारण करेन.
“भक्त उदय होईबे गाँव–गांव भूली मेली करिबेसे।“
अर्थात –
संपूर्ण विश्वातील सर्व भातजनांचे गावा गावात, शहरा शहरात एकत्रीकरण होईल. प्रत्येक युगाच्या अंतिम समयी धर्मसंस्थापनेच्या वेळी सुरभी श्री हरीच्या पवित्र भक्ताचे एकत्रीकरण होत असते.
महान पुरुष अच्युतानंद जी पुन्हा अशा प्रकारे लिहितात–
“तर्कितिबु तेरकु चाऊदह पन्द्र लागिब हुन्दर सता कुजीबु सतरु।“
अर्थात –
जेव्हा भगवान कल्कि तेरा वर्षांचे होतील तेव्हा संपूर्ण जग उजळून निघेल. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येईल, हे सर्व काय घडत आहे ज्याचे काही निदान नाही, सर्व जण भयभीत होतील आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरेल. जे आपण सर्वांनी 2020 मध्ये आपल्या डोळ्यांनी पाहिले त्यानंतर दरवर्षी एक ना एक अप्रिय घटना सुरू झाल्या आणि भविष्यातही न ऐकलेल्या घटना एकापाठोपाठ एक घडत राहतील.
जे लोक विचार करतात कि विपत्ती टाळली आहे त्यांना चुकीचा गैरसमज होत आहे. हि विनाश रूपी लीला पुढेही कोणत्या ना कोणत्या रूपात घडतच राहील. फक्त भक्तच या गूढ रहस्याला समजूशकतील कि प्रभुंचा अवतार झाला आहे. या संपूर्ण विश्वात जे काही घडत आहे ते सर्व काही प्रभूंची विनाश लीला आणि धर्मसंस्थापना याचाच एक भाग आहे.
संपूर्ण जगाच्या भक्तांच्या उद्धारासाठी आणि भक्तांना प्रभूंची धरवताराची झाल्याची सूचना पोहचवण्यासाठी तसेच भक्तांचे एकत्रीकरण कसे होईल आणि धर्मसंस्थापना कश्या प्रकारे होईल याची सूचना प्रभूंच्या भक्तांपर्यंत पोहचवण्यासाठी ६०० वर्षांपूर्वी भविष्य मालिका ग्रंथाची रचना झाली.
जगातील कोणत्याही ग्रंथात कलियुगाचा अंत आणि धर्मसंस्थापना या बाबतीत स्पष्ट शब्दात कोणतीच माहिती नमूद केलेली नाही. काळाची गरज ओळखून सर्व जाणकार भक्तांनी सनातन धर्माचे पालन करावे आणि धर्माचे अनुसरण करावे.
जो पर्यन्त भक्तांचे एकत्रीकरण करण्याचे कार्य पूर्ण होत नाही तो पर्यन्त खंड प्रलय संत गतीने होत राहील. २०२३ पर्यंत भक्तांचे एकत्रीकरण झाल्यावर सर्व पवित्र भक्तांना भगवान कल्कीचे भेट होईल. त्या नंतर भवन कल्की यांची विनाश लीला आणि विश्व युद्धाची भीषण आपदा तसलेच पंचभूत प्रलययाचे भीषण दृश्य मनुष्य आपल्या डोळ्याने पाहतील.
महान पुरुष अच्युतानंद जी पुन्हा अशा प्रकारे लिहितात–
“संसार सहमय अति मायामय सहमय कुपूजा, करह कर्मवामो हेले संज्ञाहीन हेबु नरहिब, थलकुल भारण वेहलकु बिहन बाँटिबी चिन्ही, नपारिबे केहिबी लख्य पंचासी ग्रंथ बुझाईबी संभलरे उदय होईबी।”
अर्थात –
हा संसार मायामय आहे. भक्तांची मती मायेमुळे भ्रष्ट झाली असेल तर अंत समयी देखील भगवत प्राप्ती ऐवजी ते मृत्यू चक्रव्यूहात अडकतील म्हणून विश्वातील सर्व भक्तांनी याचे गांभीर्य ओळखून आपला प्रत्येक क्षण फक्त भगवत भक्तीत कारणी लावला पाहिजे. जेव्हा अशी प्रतिकूल परिस्तिथी असेल तेव्हा मालिका त्यांच्या समोर एखाद्या आश्चर्य प्रमाणे त्यांच्या पर्यन्त पोहचेल त्यावेळी मालीका ऐकून एक आवेग उत्पन्न होईल. जे लोक या मालिके वर विश्वास करतील ते सर्व भक्त प्रभुंना शरण जातील आणि सत्ययुग पाहतील.
“जय जगन्नाथ”