ज्ञान मार्गी लोकं जास्त संशयी आणि भ्रमित असतील.
महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेली ओळ-
“घोर कलीकाल थोयो ना रहिबो ज्ञानी हेबे जान बाट बडां,
मंगो मंगुवालो बोलो ना मनिबे ज्ञान कही अकलणा।“
अर्थात –
ईश्वराचे अस्तित्व जाणण्यासाठी ज्ञान मार्गच अवलंबणारे ज्ञानी लोकं सर्वात जास्त संशयी आणि भ्रमित होतील. आणि अशी लोकं त्यांच्या तुटपुंज्या विज्ञान व तर्क पद्धतीने ईश्वराप्रत पोहोचण्याचा आणि त्यास जाणण्याचा प्रयत्न करण्यात मग्न असतील. श्रद्धा, भक्ती, दृढ विश्वास आणि भगवंता वरील निस्सीम प्रेम ह्या द्वारे ईश्वर प्राप्ती चा जो सर्वात सोपा मार्ग आहे तो त्यांना उमगणार नाही.
जय जगन्नाथ