प्रभुंचा मंगल विवाह सोहळा आणि पद्मकल्प ग्रंथातील भक्तांचा नामोल्लेख
“बचिहिर चरणनख छटार महिमा रख्य संख्या कल्पे कल्पी नपारिले ब्रह्माजे।“
अर्थात –
प्रकृती चे निर्माणकर्ता ब्रह्मदेव जेथे भगवान श्री कृष्णाच्या पद कमलांच्या नखाचेही वर्णन करण्यास कमी पडले तर मग माझ्या सारख्या पामर त्या मधुसूदन प्रभूंच्या महिमांचे काय वर्णन करणार. अखंड दृढ भक्ती द्वारेच प्रभुंचा कृपाशिर्वाद प्राप्त करणे शक्य आहे. निस्सीम भक्ती शिवाय, कोणी कितीही ज्ञानी असला तरी त्यास प्रभुंचे यथार्त महिमा वर्णन करणं शक्य नाही.
महान पुरुष श्री अच्युतानंद ह्या विषयावर पुढे लिहितात…
“आउ केते ग्रंथ अछई गुपत ग्रंथ छि प्रभु पास, पद्मकल्पटिका समस्त भकत महिमा केति प्रकासो, खेला उदय हेब भकतंक लीला भारी होइब लीला उदय हेब।“
अर्थात –
महा पुरुष श्री अच्युतानंद ह्यांनी तीनशे खण्डात १, ८५,००० मालिका ताम्र पट अथवा ओवयांची केलेली रचना भविष्य मलिका या नावाने प्रसिद्ध आहेत . त्यांनी मालिकेच्या पद्मकल्प ग्रंथात कल्की देवांच्या सर्व भक्तांबद्दल तपशीलवार लिहून ठेवलेले आहे. स्वतः भगवान विष्णू आणि महादेवांनी देवी देवतांना ह्या ग्रंथाची माहिती देऊन तो विविक्षित ठिकाणी गुप्तपणे सुरक्षित ठेवला होता.
महान पुरुष श्री अच्युतानंद ह्या विषयावर पुढे लिहितात…
“तेंतीस कोटि देवता दिगपाल ब्रह्मा शंकरभा वीणा अखय अवय ग्रंथ रखीछन्ति बिरजा खेत्रे गोपन।“
अर्थात –
महापुरुष म्हणतात की ह्या अजरामर दैवी ग्रंथाची रचना प्रत्यक्ष भगवान महाविष्णू, ब्रह्मदेव व महादेव यांनी मिळून केलेली आहे. प्रत्येक युगात, जेव्हा सुधर्मा महा सभा होते आणि त्यात चतुर्युगातील भक्तांची भेट होते, त्या समयी हा पवित्र ग्रंथ प्रकाशित होत असतो.
महान पुरुष अच्युतानंद जी या विषयावर पुढे लिहितात…
भगवान श्री कृष्णानं त्यांची आणि माता रुख्मिणीची ( श्री लक्ष्मी देवी ) दिव्य आभूषणे ह्या पद्मकल्प ग्रंथा बरोबर गुप्तपणे ठेवलेले आहेत. येणाऱ्या काळात ओडिशातील जाजपूरच्या पवित्र भूमीवर होण्याऱ्या सुधर्मा महा सभेत श्री कल्की देवांच्या भक्तांची नावे, ओळख, ग्राम, जन्म ठिकाण, त्यांच्या माता व पित्याची नावे, भूतकाळातील त्यांचा कालखंड अशी माहिती उघड केली जाईल. पाच नद्यांचा संगम असलेल्या वैतरणी नदीच्या काठावर सुधर्मा महा सभा होईल. ह्या भक्तांच्या सभेला प्रत्यक्ष भगवान शंकर , माता पार्वती आणि ब्रह्मदेव जातीने उपस्थित असतील.
महान पुरुष अच्युतानंद जी या विषयावर पुढे लिहितात…
“लख्मी नरसिंह मिलन खंडगिरि ठारे होइबो पूर्ण रामचंद्ररे, जहूँ आसिबे चतुरानन रामचंद्ररे महादेब जेआसिबे तांडव नृत्यरे मग्न होइबो रामचंद्ररे, अस्ट दुर्गा संग तरेथिबे रामचंद्ररे एखेल गुपत हेब भक्तबिना अन्य केनाजनिब रामचंद्ररे, अउ एखेल गुपते हेब रामचंद्ररे।“
अर्थात –
भगवान कल्की आणि श्री देवी लक्ष्मी यांचा विवाह सोहळा स्वतः ब्रह्मदेव ओडिशातील खंडगिरी पर्वता खालील आश्रमात आयोजित करणार आहेत. भगवान शंकर, देवी पार्वती, अष्ट दुर्गा, देवी योग माया, इतर देव देवता आणि भगवान कल्की ह्यांचे मोजकेच असे शुद्ध मानव भक्त ह्या ब्रह्म मुहूर्तावर गुप्तपणे होण्याऱ्या विवाह सोहळयास उपस्थित असतील. ह्या मंगल वेळी, प्रत्यक्ष महादेव हर्षोलसाने तांडव नृत्य करून विवाह सोहोळ्याची शोभा वाढवतील.
दिव्य भक्ताचा अर्थ असा आहे की तो भक्त अगदी गरीब असला तरी त्याची भगवत भक्ती उत्कट, दृढ आणि शुद्ध असेल.
“जय जगन्नाथ”