भारतात फक्त 33 कोटी लोकसंख्या राहणार आहे
थोर पुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये–
तिसर्या महायुद्धा अखेर त्रिभुवनपती भगवान कल्की द्वारा होण्याऱ्या वैश्विक सनातन धर्म स्थापने दरम्यान असणारी भारतातील लोकसंख्या आणि परिस्थिती याबद्दल ओरिसाच्या गुप्त ग्रंथ भविष्य मलिकामध्ये उल्लेख आलेला आहे.
“अर्धरु अर्धे मरिबे भारतवर्षरे सब राज्य शून्य हेब जुद्ध गल परे।“
अर्थात –
तिसऱ्या महायुद्धानंतर भारताच्या तेव्हाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त एक चतुर्थांश लोकसंख्या जीवित राहील. अच्युतानंद जी पुन्हा भविष्य मलिकामध्ये लिहितात की ह्या वेळी भारतातील सर्व राज्ये उजाड होतील.
“गांव के रहिबे तीनी चारी जण पवन आहार करी।
अर्न मिलिब अर्न नमिलिब जल मुखेवलुथु हरि।।“
जय जगन्नाथ।।जय जगन्नाथ।।जय जगन्नाथ पतितपावन उड़ीसा बड़ ठाकुर।
कल्पवट वासी प्रभु ब्रह्मराषि कली कलुष निस्तारण।।
अर्थात –
भारतातील सर्व राज्ये उजाड होतील. प्रत्येक गावात फक्त तीन ते चार लोक जिवंत राहतील, गावात राहणाऱ्या मोजक्याच माणसांना सुद्धा अनेक दिवस खायला अन्न मिळणार नाही. असे सर्व श्री कल्की माधवांचे नाम घेत तग धरतील. धर्म स्थापने पासून ते महायुद्ध समाप्ती पर्यंतचा तीन-चार महिन्यांचा कालावधी हा अत्यंत क्लेशदायक असेल, त्या वेळी केवळ माधव नावावर अवलंबून जीवित राहावे लागेल. ईश्वर भक्तांना हा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
भारतात फक्त 33 कोटी लोकं जीवित राहतील. आणि भारताशिवाय इतर देशांची लोकसंख्या 31 कोटींवर येऊन ठेपेल. जगाची एकूण लोकसंख्या ८०० कोटींवरून केवळ ६४ कोटींवर येईल.
“बलराम हेबे राजा कान्हू परिचार, बसिब सुधर्मा सभा जाजनग्र ठार।“
भगवान कल्की, त्या ६४ कोटी जीवित भक्तांपैकी एक लाख भक्तांना राजा बनवतील. त्यानंतर ओरिसा राज्यातील बिरजा क्षेत्री भगवान कल्की यांच्या हस्ते राजसूय यज्ञाचा भव्य विधी करण्यात येईल. भगवान कल्की द्वारे पृथ्वीवर राज्य व्यवस्था पुन्हा स्थापित होईल . भगवान स्वतः चक्रवर्ती सम्राट बनून आपल्या प्रिय भक्तांसह संपूर्ण जगावर १००९ वर्षे राज्य करतील आणि सरतेशेवटी आपल्या स्वधामास (वैकुंठी ) परततील.
जय जगन्नाथ