मायेच्या प्रभावामुळे प्रभुंना सर्वसाधारण मनुष्य ओळखू शकणार नाही
महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी मलिकामध्ये लिहिलेली एक दुर्मिळ ओळ-
जोगी मानहे जोगा अंतना पाइबे आहू केमु समरहथा।
जार लागी खेल तार लागी काहल से बेल कुकाल कथा।।
अर्थात –
कली युगाच्या समाप्ती समयी, श्री कल्की देवांच्या आलोकिक मायेमुळे त्यांच्या अवताराला योगी, ऋषी, मुनी, देवताच काय पण अगदी ब्रह्मदेव व महादेव पण सहजी ओळखू शकणार नाहीत. कलियुगातील साधारण मनुष्य गण जे विषय-वासना रुपी मायेच्या प्रभावात अडकलेले आहेत आणि ज्यांना शुद्ध भागवत भक्तीची जाण नाही असे सामान्य लोकं श्री कल्की देवांचे अवतार स्वरूप ओळखण्यास असमर्थ ठरतील. यास्तव विष्णू प्रिय भक्त गरुड प्रभुंना विचारतात कि हे भगवंता कृपा करून मला सांगा, कलीयुगाच्या शेवटी होण्याऱ्या आपल्या अवतारास मी कसे ओळखू ? भगवंतानी केलेल्या गरुडाच्या शंकांचे निरसन आणि त्यांचे संभाषणाचे संदर्भ “गरुड संवाद भविष्य मालिका” मध्ये लिहिले गेलेले आहेत.
महापुरुष अच्युतानंद दास जी नी त्यांच्या दैवी ग्रंथ भविष्य मालिकां मध्ये लिहिले आहे की, कलीयुगाच्या शेवटी जे लोक ह्या ग्रंथांना नावे ठेवतील, अविश्वास दाखवतील आणि वाईट प्रकारे टीका व हेटाळणी करतील अश्यांना देवी महामाया आणि महा काल यांची शिकार व्हावे लागेल. त्यानंतरच अश्या टवाळखोरांना मालिकेचे अनमोल महत्त्व कळेल पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. वेळेचे गांभीर्य योग्य वेळी ओळखणे हे जाणकार लोकांकडूनच शक्य आहे.
जय जगन्नाथ