म्लेच्छ कोणाला म्हणतात?
सत्ययुगात भगवान विष्णूने अवतार घेतला आणि जगात सत्य, शांती, दया, क्षमा आणि मैत्रीची स्थापना केली. त्या काळी सर्व मानव धर्मग्रंथांचे जाणकार होते आणि सर्व वैदिक परंपरेनुसार जगत असत. त्यावेळी ऋषी–मुनी ज्ञानाच्या दृष्टीकोनातून अहंकारी आणि गर्विष्ठ झाले होते. आणि त्या पापामुळे सत्ययुगाचा अंत झाला. त्रेतायुगात भगवान श्रीरामांचा अवतार झाला आणि लोकांना यज्ञ इत्यादी पुण्यकर्माद्वारे भगवान श्रीरामांच्या सानिध्याचा लाभ झाला आणि त्रेतायुगाच्या शेवटी त्यांनी रावणसारख्या महापापी राक्षसाचा विनाश केला आणि शेवटी खंड प्रलय झाला.
त्रेतायुगानंतर द्वापार युग आले. या युगात भगवान श्री कृष्ण बरोबर गोलोक धाम मधील भक्तांनी पुनः धर्तीवर कृष्णाच्या सानिध्यात आपले जीवन व्यतित केले आणि युगाच्या शेवटी पुनः सर्व भक्त गोलोक वैकुंठ धामाला परतले आणि भगवान श्री कृष्णांनी आपला देह त्याग केला त्या वेळी कलियुगाला १,२०० वर्ष इतका काळ भोग झाला होता. आणि कली मायेचा प्रभाव पृथ्वीवर पसरवीत होता. या संबंधी भागवतात एक श्लोक आहे-
“यदा देवर्षयः सप्त मघाषु बिचरन्तिहिं,
तदा प्रबृत्तस्तु कलि द्वादशार्द्द – शतात्मकः।”
जेव्हा माघ नक्षत्रात सप्तर्षी विचरण करत होते तेव्हा (भगवान श्री कृष्णांच्या वैकुंठात परत जाण्याच्या वेळेपर्यंत) कलियुगाला 1,200 वर्ष भोग झाला होता. त्यानंतर महाराजा परीक्षित यांचा मृत्यू झाला व कली ने पूर्ण ब्रम्हांडावर आपला प्रभाव पसरवला. या युगात लोक लोभ, आसक्ती, काम, क्रोध, अहंकार, मोह, आणि आळस अशा दुर्गुणांच्या अधीन होतील, लोकांना शास्त्र, पुराण, वेद यांचे ज्ञान असले तरी लोक शास्त्र आणि वेदविरोधी कृत्ये करतील. जे धर्माला चुकीचे समजतात, वेदांचा विरोध करतात, प्राण्यांना मारण्यासारखे पाप करतात, जे मादक द्रव्यांचे सेवन करतात, देवतांना विरोध करतात, त्यांना कलियुगात म्लेच्छ (पापी) म्हणतात.
श्री जयदेवजींनी गीत गोविंदमध्ये लिहिले आहे:
“म्लेच्छनीवह नीधने कलयसी करवालम्।
धूमकेतुमिव किमपि करालं,
केशव धृत, कल्कि शरीर,
जय जगदीश हरे।“
या दुष्ट पापी आणि म्लेच्छांचा नाश करण्यासाठी भगवान कल्की धूमकेतूसारखे उग्र रूप धारण करतील.
जय श्री सत्य अनंत माधव