युग स्थित्यंतर आणि श्री कल्की अवतार संकेत
महापुरुष श्री अच्युतानंद दास आणि महापुरुष श्री शिशु अनंत दास यांच्या भविष्य मालिकेतील परमेश्वराच्या अवतारा संबंधी काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये–
“कली थाउ–थाउ सत्य केहुदिन हेबो केहीण जाणबीर, एणूकरी मोरो अंतना पाईबे नाथीबारु अधिकार।”
अर्थात –
कलियुग ते सत्य युग हे स्थित्यंतर कलियुगाच्या शेवटी असणाऱ्या युग संक्रमणाच्या संधी काळात नकळत होईल. प्रत्येकाला ह्या बदलाची जाणीव असेलच असे नाही. लोकं कलियुग काल गणना आणि त्याच्या समाप्ती संबंधात वृथा वाद विवाद करण्यात व्यस्त असतील. भगवान श्री जगन्नाथ पुढे म्हणतात कि माझे गुप्त अवतार कार्य, माझे धर्म संस्थापना कार्य , आणि माझ्या भक्तांच्या उद्धाराचे कार्य ह्या तर्क वितर्क करण्याऱ्या लोकांना अवगत होणार नाही. प्रत्येकजण त्यांच्या अर्धवट ज्ञानाने विविध तर्क करण्यात गुंगून जाईल, परंतु कोणीही मला ओळखू शकणार नाही. पापी लोकं विशेषत: ज्यांनी धर्माचा व्यवसाय केला आहे, ज्यांनी धर्माचा ढाल म्हणून वापर केला आहे, ज्यांनी धर्माचा उपयोग उपभोग आणि कौटुंबिक मौज मजा आणि श्रीमंती साठी संपत्ती लाटण्याचे एक साधन म्हणून केला आहे, अश्यांना माझ्या अवताराबद्दल अथवा माझ्या धर्म संस्थापना कार्या बद्दल कुठलेही माहिती ज्ञात करून घेण्याचा हक्क कधीच मिळणार नाही.
पक्षीराज गरुडाने श्री भगवंतास प्रश्न केला …
हे जगदप्रभू , कृपया मला सांगा कि हे कलियुग कधी संपणार ? तुम्ही मर्त्य लोकांत ( पृथ्वी वर ) कधी अवतरणार ? आणि तुम्ही तुमच्या भक्तांना मुक्ती कशी देणार ?
चक्रधर कमलनयन भगवान महाविष्णू पक्षीराज गरुडाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात आणि म्हणतात…
गरुडा ऐक ! कलियुगाच्या शेवटी, म्हणजेच कली युगाच्या सुरुवातीपासून ची पाच हजार वर्षे उलटून गेल्यावर, आकाशात चंद्राच्या अगदी शेजारी एक तारा दिसेल ( २००५ मध्ये अनेकांनी जवळपास दोन महिने हि रचना आकाशात पाहिलेली आहे ) आणि त्यावेळी जेव्हा जगन्नाथ पुरीचा वर्तमान राजा दिव्यसिंग देव ( चतुर्थ ) ह्या नावे असेल आणि त्याचे ४७ वे वय वर्ष पूर्ण होईल, त्यानंतर मी पृथ्वीवर अवतार घेईन. भविष्य मालिकेमध्ये ह्याची स्पष्ट नोंद आणि उल्लेख केला गेलेला आहे.
पक्षीराज गरुड पुन्हा एकदा श्री प्रभुंना विचारतात, हे जगाचे रक्षण कर्ता, कृपया मला मार्गदर्शन करावे कि कलियुगात भक्तांना तुमच्या अवताराबद्दल कसे अवगत होईल ?
पुन्हा एकदा दयाळू भगवान श्रीहरी पक्षिराज गरुडास गंभीरतेने सांगतात…
हे गरुडा, हे गूढ रहस्य कलियुगाच्या धगीत होरपळलेल्या प्रत्येक मनुष्यास कळणार नाही. जे भौतिकवादी लोकं सदैव संपत्ती मिळवण्याच्या मागे असतील, जे त्यांच्या भोग विलासाच्या शारीरिक इच्छा पूर्ण करण्यात मग्न असतील त्यांना हे गुप्त रहस्य जाणून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. असे लोकं माझ्या दैवी पवित्र वैकुंठाचे (गौ लोक) निवासी होणार नाहीत. पूर्वीच्या तीनहि युगात माझे जे भक्त वैकुंठाचे निवासी असतील, जे देवता, यक्ष किंवा गंधर्व झाले असतील, त्यांनाच भविष्य मलिकेच्या प्रसारातुन माझ्या पृथ्वी वरच्या अवताराबद्दल कळेल आणि तेच भक्त मला पृथ्वीवर धर्म संस्थापनेच्या कार्यात मदत करतील.
अशाप्रकारे, भविष्य मलिके मध्ये वर्णन केलेली प्रभूंच्या अवतार पूर्वीची सर्व लक्षणे २००५ मध्येच पूर्ण झाली आहेत आणि वर्तमान समयी प्रभूंचा अवतार पृथ्वीवर झालेला आहे !!!
पंच सखांपैकी एक असलेल्या शिशु अनंत दास ह्यांनी लिहिलेल्या मालिकेत, प्रभूंच्या अवतार पूर्वीची आणखी एक लक्षण अशा प्रकारे वर्णन केले आहे …
“कर जोड़ी बोले बारंग भगत शेखर मुकुट मणि, बेलकला जाणी कलपतरुरे गरल फलिबे पुनि, एण पराएक होइबो बारंग रस मधुरो लागिबे, आदोरे भकईबे कलीजुगे नरे भकी भस्म होइजिबे।”
अर्थात –
कलियुगाच्या शेवटी आणि प्रभूंच्या पृथ्वीवर अवतरण्याच्या वेळी, एक संकेत देखील अशा प्रकारे पूर्ण होईल –
कडुलिंबाच्या झाडातून दुधासारखा द्रवपदार्थ झिरपेल आणि त्याची चव गोड असेल. लोकं याला चमत्कार समजून त्याचे सेवन करतील आणि त्या कडू लिंबाच्या झाडाची पूजाही करतील. असे लोक मरण पावतील. ह्या घटनाही दिसल्या आहेत. या संकेतां नंतर, कलियुगाच्या शेवटी होण्याऱ्या प्रभूंच्या अवतार बद्दल भविष्य मलिका आणि इतर ग्रंथामध्ये ही उल्लेख आलेला आहे.
ह्या वर्तमान समयी, ह्या सर्व संकेतांची पूर्तता झाली असून, भगवान श्री कल्कि साक्षात पृथ्वीवर अवतरले आहेत. आणि त्यांचे धर्म संस्थापनेचे आणि त्या साठी आवश्यक असे संहार कार्यही सुरू आहे. सध्याच्या काळात ह्याचा परिणाम जागतिक स्तरावरही दिसून येत आहे.
जय जगन्नाथ