विनाशकारी भूकंपानंतर सूर्यदेव पश्चिमेला उगवतील.
महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी रचलेल्या भविष्य मलिकेच्या दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-
“भूमिकम्पे प्रकम्पित होईबे धरणी, पहाड़ जंगल सब माटिरे मिसिब, बिचित्र परिबर्तन पृथिबिरे हेब।“
अर्थात–
येत्या भविष्य काळात पृथ्वीवर मोठ्या क्षमतेचे थरकाप उडवणारे भूकंप वारंवार होतील, घरे, मोठ्या इमारती क्षणात कोसळून जमिनीखाली गाडले जातील. डोंगर, पर्वत आणि जंगले ह्यात आश्चर्यकारक बदल घडतील व मोठी उलथापालथ होऊन ते मातीत मिसळतील. ह्या भूतो न भविष्यती अश्या विनाशकारी घटनांमुळे सूर्यदेव पश्चिमेला उगवतील आणि पूर्वेला मावळतील. ह्या सर्व विनाशकारी व विस्मयकारी बदलांचे लोके साक्षी राहतील .
जय जगन्नाथ