काही भक्तांनाच श्री कल्कीं चे दुर्लभ दर्शन होईल.
महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या भविष्य मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये–
“कहु अछिहेतु करी सुण सुज्ञ जने, कलीरे कलंकी रूप हेबे भगवान, कपटरे करूछन्ति लीला एसँसारे कपटरे।“
अर्थात –
पंच सखांनी हि भविष्य मलिका ही कोण्या भक्ती विरहित साधारण विचारसरणी ने सामान्य जीवन जगणाऱ्या मनुष्य वर्गा साठी निर्माण केलेली नाही, तर जे पुण्यवान असे पवित्र, निस्सीम भगवंताचे भक्त आहेत अशांच्या पूर्वजन्मातील संस्काराचे स्मरण राहण्यासाठी आणि तसेच कलियुग सरते समयी भक्तांना भगवान कल्कीं चा अवताराचे ज्ञान होण्यासाठी भविष्य मलिकैची रचना केली गेलेली आहे.
महापुरुष पुन्हा एकदा म्हणतात…
भगवान कल्की पृथ्वीवर नक्की अवतार घेतील. परंतु प्रभूंचे अवतार कार्य आणि त्यांच्या लीला ह्या गुप्त पणे होतील. आणि ह्या गुप्त कार्या नुसार काही भक्तांनाच श्री कल्कीं चे दुर्लभ असे साक्षात दर्शन होईल.
“गुप्त अंगे खेलुच्छन्ति गुरुअंग धरि, गुरुअंग धरि सेत संसाहर को आसी, गुप्तरास जे गोपी संगे खेली ना प्रकाश गुप्तरासोजे।“
अर्थात –
भगवान श्री हरीचा अंशावतार श्री परशुराम महाराज हे कल्कींचे गुरु असतील. भगवान कल्की हे श्री विष्णूंचे साक्षात अंशावतार असतील व भगवान वेदव्यास, श्री हरी आणि परशुराम महाराजांच्या सर्व शक्ती सामर्थ्यानिशी पृथ्वीवर भक्त संरक्षणार्थ व धर्म संस्थापना करण्यासाठी अवतरतील.
श्री कल्कीं वर निर्मल आणि दृढ भक्ती असणाऱ्या काही शुद्ध भक्तांना त्यांचे दुर्लभ दर्शन होईल. परंतु ज्यांच्या मनात श्री कल्कीं बद्दल द्वंद्व आहे, साशंकता आणि प्रश्न आहेत, ज्यांच्यात श्रद्धेचा अभाव आहे व जे ईश्वराची परीक्षा व पुरावा मागतील अश्यांना कल्की प्रभूंचे काकणभर सुद्धा दर्शन प्राप्त होणार नाही
महान पुरुष पुन्हा एकदा अशा प्रकारे लिहितात.
“खिराधिनाथ कलंकी रूपहेले जेलू, खितिरे कलंकी लीला प्रकासुछि तेणू भ्रमे सुनेहे।“
अर्थात –
भगवान कल्की त्यांच्या चौसष्ठ कलांसह मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतरतील. स्वतः श्री हरी त्यांचे क्ष्रीर सागरातील वैकुंठ निवासस्थान सोडून, शेषावतार बलरामांना त्यांच्या एकाच शरीरात सामावून घेऊन पृथ्वीवर कार्य करतील. सर्व भक्त जगत्पत्ती श्री विष्णूंना कल्की स्वरूपात जाणतील.
जय जगन्नाथ