चारही युगातील भक्त एकच आहेत
महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये…
=
कलियुगाच्या शेवटी होण्याऱ्या भगवान श्री विष्णूंच्या अवताराची माहिती सर्वांनाच असणार नाही. भविष्य मलिका ग्रंथावर विश्वास ठेवणारे आणि त्याचे पालन करणार्या सनातन भक्तांनाच हे अवतार स्वरूप कळेल.
श्री अच्युतानंद दास मालिकेत पुढे लिहितात…
“कृष्ण भाबरस नोहे वेदाभ्यास पूर्व जार भाग्य थिबा।“
अर्थात –
जे पूर्व जन्मापासून भगवंताचे भक्त आहेत आणि ज्यांचे हृदय भगवान श्री कृष्णांच्याप्रती प्रेम आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले आहे, त्यांनाच मानव रूपात आलेल्या श्री कल्कीं चे दर्शन घडेल. शुद्ध भक्तीच्या अभावाने, वेद शास्त्र पारंगत विद्वान, मठाधिपती (महंत), संन्यासी इत्यादी लोकं मानवी रूपात आलेल्या भगवान श्री कल्कींना ओळखू शकणार नाहीत.
श्री अच्युतानंद दास मालिकेत पुढे लिहितात…
जे लोकं वेद किंवा अष्टदश पुराणं जाणतात आणि स्वत:ला महान वेद पारंगत विद्वान मानतात आणि लाखो अनुयायी करतात, अश्यांना भक्तीच्या अभावाने भगवान श्री कल्कि रामांचे दर्शन होणार नाही. ज्या भक्तांवर मागील कित्येक जन्मांपासून ईश्वर भक्तीचे दृढ संस्कार झाले आहेत त्यांनाच भगवान श्री कल्कि रामांचे साक्षात दर्शन प्राप्त होईल.
सत्य युगातील यती (ऋषी), त्रेता युगातील कपी (वानर), द्वापर युगातील गोप-गोपी आणि यदु वंशी ( जे भगवान श्री कृष्णां चे सखा होते ) आणि सध्याच्या कलि युगातील भक्त असे चारही युगातील भक्त एकच आहेत . ह्या भक्तांना वेद शास्त्रांचे ज्ञान नसले तरी तेच भक्त भगवंतांच्या आश्रयाला येतील आणि सुवर्णमय अश्या येण्याऱ्या सत्य अनंत युगात जातील.
तारो ताको माया झाकी यह माया, तारो ताको काया झाकी यह माया, निश्चय वासना वसीब।
अर्थात –
जे पूर्वी यती, कपी, तपी आणि गोपी होते त्याच भक्तांना मालिकेतील प्रभूंच्या वाणीची सत्यता उमगेल. तेच भक्त मालिकेतून मिळालेल्या संदेशांनुसार प्रभू श्री कल्की देवांच्या आश्रयाला येतील. समाजात, लाखो अनुयायी असण्याऱ्या मोठ्या तपस्वी ज्ञानी लोकांना गर्व आणि अभिमानाच्या दोषांमुळे भगवंतांची प्राप्ती होणार नाही. पण ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, ज्यांची भक्ती पवित्र आहे, जे अहंकार रहित आहेत आणि ज्यांच्यात दांभिकता कणमात्र नाही केवळ तेच प्रभूंचे भक्त होतील. त्यांनाच परमात्म्याची प्राप्ती होईल. मालिकेचा संदेश आणि विचार त्यांच्या पर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचेल. असे ते सर्व भक्त अति भाग्यवान असतील.
जय जगन्नाथ