पंच ध्वज, जागतिक राजधानीची स्थापना व इतर धर्म व पंथ समाप्ती.
महामानव अच्युतानंद दास यांनी भविष्य मलिका मधील काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये–
“निराकार कर्म धर्म करिष्ट, इस्लाम,बौद्ध,जैन सरबे पड़िबे भाजी दम्भ गर्ब तांको जिबटी हजिलो जाइफलरो सुन्यबादी सुन्य हेबेगांजी।“
अर्थात –
कलियुगाच्या अंतिम वेळी, जगातील इतर सर्व धर्मातील सत्यनिष्ठ आणि नीतिमान लोक अहंकार रहित होऊन सनातन धर्म अंगीकारतील. वैश्विक सनातन धर्म संस्थापनेच्या कार्यात पंच महाभूतांकडून होणाऱ्या विनाशात सर्व धर्मातील पापी लोकं मरतील व इतर धर्मातील सर्व शुद्ध नीतिमान लोकं सत्ययुगात जातील. इतर सर्व धर्म व पंथ संपुष्ठात येतील.
“केवल ए सनातन धर्मकु स्थापिबे सेनारायण अउ अन्य धर्म हेबो चूर्णों।“
अर्थात –
भगवान कल्की नारायण सोळा मंडळांच्या भक्तांच्या मदतीने वैश्विक सनातन धर्माची स्थापना करतील. तसेच इतर सर्व धर्मांचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येईल . संपूर्ण जगाची राजधानी भारतातील ओरिसा राज्यातील माता बिरजा देवी च्या पवित्र भूमीत असेल. भगवान कल्की नारायण ह्याच बिरजा क्षेत्रातून संपूर्ण जगावर राज्य करतील.
“स्वेत,पित,लोहित,हरित तन्मध्ये निल बर्ध्य तन्मध्ये एकाक्षर।“
अर्थात –
सत्य सनातन धर्माच्या पंच ध्वजात पांढरा, पिवळा, लाल, निळा आणि हिरवा असे रंग असतील. द्वापरयुगातही परमेश्वराचा हाच “पंचरंगी” (पाच रंगाचा) ध्वज होता. भगवान कल्कीचा हा ध्वज भविष्यात जगभर गौरवाने फडकवला जाईल.
“गरुड़ पृष्ठरे बसी विलात को जिबे से ब्रह्मराशी लोजाइफूलो सेही आणिबे स्वेततुलसी।“
अर्थात –
भगवान कल्कि गरुडारूढ होऊन महायुद्धाच्या शेवटी विलायतेला ( इंग्लंड मध्ये ) जातील. कल्की देव इंग्लिश सैन्याला घनघोर युद्धात हरवतील आणि पापी, सनातन धर्म विरोधकांचा नाश करून त्यांच्या भक्तांचे रक्षण करतील . त्याच वेळी ते त्यांच्या एका निस्सीम सद् भक्ताला इंग्लडच्या गादीवर राज्याभिषेक करून बसवतील.
इंग्रजांनी पूर्वी भारतातुन लुटून नेलेल्या काही मौल्यवान वस्तू जसे कि पांढरी पवित्र तुळस, मयूर सिंहासन आणि कौस्तुभमणी ( कोहिनूर हिरा ) भगवान कल्की आपल्याबरोबर भारतात परत आणतील.
“जय जगन्नाथ“