संपूर्ण जगाच्या मानवी समाजाच्या उद्धारासाठी हे अत्यंत आवश्यक आहे   कलियुग समाप्त झालेला आहे.शास्त्र आणि  मनुस्मृती मध्ये चार युगांचे वर्णन आढळते.  त्या युगांची नावे आहेत – 1) सत्ययुग, 2) त्रेतायुग, 3) द्वापारयुग, 4) कलियुग.  या चार युगांनंतर एक गुप्त युग देखील येते ज्याला अनंत युग” किंवा आद्य सत्ययुगम्हणतात आणि ते सिद्ध झाले आहे. याचा पुरावा मुख्यतः पंचसखांनी लिहिलेल्या “भविष्य मालिका” ग्रंथात उपलब्ध आहे. जे आज लोकांना माहीत नाही. परंतु संपूर्ण जगातील मानवी समाजाच्या उद्धारासाठी ही रहस्यमय बाब अत्यंत आवश्यक आहे.                 धर्मग्रंथानुसार कलियुग संपुष्टात आले आहे, परंतु त्याचा प्रभाव अजूनही संपूर्ण जगात पसरलेला आहे. हा कलियुगाचा शेवटचा टप्पा आहे, म्हणून कलिने संपूर्ण जगाला, संपूर्ण मानव जातीला ग्रास केले आहे. विशेषत: जगात भावा- भावा मध्ये, पती-पत्नीमध्ये, कलि ने घरा-घरात, गाव - गावात, राज्य- राज्यात आणि देश-देशात आपला प्रभाव पसरवला आहे. आज संपूर्ण जग त्रस्त आहे. रोगराईने संपूर्ण जग ग्रासलेआहे. आज मानव समाजाला औषधांशिवाय जगणे कठीण झाले आहे. येत्या 8 वर्षांत संपूर्ण जगाला खालील भयंकर संकटांचा सामना करावा लागणार आहे.
  1. तिसरे महायुद्ध
  2. अन्न संकट
  3. पवन प्रलय
  4. महापूर
  5. अग्नि प्रलय
  6. भूकंप
  7. दुष्काळ
  8. अज्ञात रोग/महामारी
 पुढे "2025" मध्ये जेव्हा शनि मीन राशीत प्रवेश करतील, तेव्हा वरील सर्व संकटे तीव्र स्वरूप धारण करतील. येत्या काळात सर्व वैज्ञानिक उपकरणे, संगणक, उपग्रह इत्यादी अचल (बंद) होणार आहेत.       मानवी समाजाचे रक्षण कसे होणार? आणि मानवाचे भविष्य काय असेल? सा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या ग्रंथात वर्णन केलेली आहेत, त्या अमूल्य ग्रंथाचे नाव आहे "भविष्य मालिका". या भविष्य मालिका ग्रंथाची सर्व पुस्तके ओडिशामध्ये ६०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या पंचसखांनी ‘ओडिया’ भाषेत लिहिली आहेत. त्यामुळेच आजपर्यंत हे गुप्त पुस्तक लोकांसमोर येऊ शकलेले नाही.               महाप्रभू श्री जगन्नाथ जी यांच्या अपार कृपेने, आमच्या कल्की अवतार” या यूट्यूब चॅनेलद्वारे, "भविष्य मालिका" चा वर्ष 2018 पासून हिंदी भाषेत प्रचार केला जात आहे. भविष्य मालिका सध्याच्या काळात प्रभूंच्या इच्छेनुसार इंग्रजी, हिंदी, गुजराती सारख्या भारतातील इतर प्रमुख भाषांमध्ये अनुवादित आणि संपादित केले जात आहे. जे लोक या पुस्तकात वर्णन केलेल्या नीतिनियमांचे पालन करतील, तेच लोक कलियुगातून सत्ययुगात प्रवेश करू शकतील. आणि तरच महाप्रभूंच्या सूचनांचे पालन करून ज्या उद्देशाने भविष्य मालिका ग्रंथाची रचना पंचसखांनी केली, तो उद्देश सफल होऊन मानव समाजाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.  केवळ मालिका ग्रंथाच्या माध्यमातून विश्व सनातन धर्माचा प्रसार होईल, भक्तांचे एकत्रीकरण होईल आणि शेवटी संपूर्ण जगात एकच सनातन धर्म असेल.          प्रस्तुत पुस्तकात  भविष्य मालिका ग्रंथांतील मुख्य सारांश दिलेला आहे ज्याला आम्ही जगातील सर्व ऋषी, संत, ज्ञानी, सज्जन आणि भक्तांना त्यांच्या  उन्नतीच्या उद्देशाने समर्पित करतो.  
जय श्री सत्य अनंत माधव