कलियुगामध्ये प्रभू महाविष्णु जींचे तीन अवतार
पंच सखांनी लिहिलेल्या भविष्य मलिका ग्रंथानुसार कलियुगात या पृथ्वीवर देवाचे तीन अवतार होतील. महापुरुष अच्युतानंद जी यांनी “ जाई फूल मालिका“ या ग्रंथात लिहिले आहे:
“कलि रे तीनि जन्म, हेबे परा प्रभु श्री नारायण, जाई फूल लो,
जाई फूल लो, से तो भक्त जिब जीबन जाई फूल लो“
अर्थात:-
कलियुगात प्रभू श्री नारायण तीन वेळा धरावतरण करतील.
कलियुगातील प्रभूंचा पहिला अवतार– भगवान बुद्ध.
“भविष्य मालिका“ नुसार, कलियुगाच्या मध्यभागी, भगवान बुद्ध अवतार घेतील. भक्त कवी जयदेव यांनीही त्यांच्या दशावतार स्तुतीमध्ये बुद्ध अवताराचे वर्णन केले आहे.
“निन्दसि यज्ञविधेरहहश्रुतिजातं
सदयहृदय दर्शितपशुघातम् ।
केशव धृत बुद्ध शरीर जय जगदीश हरे ।।“
वरील श्लोकावरून असे समजते की कलियुगाच्या मध्यभागी यज्ञात मोठ्या प्रमाणात जिवंत प्राण्यांचा बळी दिला जात होता आणि मंत्र आणि तंत्र पद्धतीच्या प्रभावाने प्राण्यांची हत्या पराकाष्ठेला पोहोचली होती. सनातन धर्माची तत्त्वे जवळपास नामशेष झाली होती. त्यावेळी भगवंतांनी आपल्या अंशाने बुद्ध रूपाने पृथ्वीवर अवतार घेतला आणि पशुबळी व पशुहत्या यांना विरोध करून सनातन धर्माची पुनर्स्थापना केली.
“ततः कलौ सम्प्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषाम्।
बुद्धो नाम्नाजनसुतः कीकटेषु भविष्यति।।“
अर्थात:-
जेव्हा राजा , महाराजा, आणि प्रजा अन्याय, अनीति आणि जीव हत्येच्या पापात पूर्णपणे गुरफटले होते, तेव्हा त्या सर्वांमध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि सत्य सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी परमेश्वराने कीकट प्रदेशात बुद्ध अवतार घेतला.
कलियुगातील प्रभुंचा दुसरा अवतार – भगवान चैतन्य महाप्रभु.
कलियुगातील दुसरा अवतार म्हणून, भगवानांनी श्री चैतन्य नावाने नदीया नवद्वीप गावात जन्म घेतला आणि भगवान विष्णुंचा महामंत्र जगभरात प्रचार प्रसार केला. त्यासोबतच प्राण्यांच्या हत्येला विरोध करत पृथ्वीवर वैष्णव धर्म पुनर्जीवित केला.
“कृष्णार प्रघता त्रिगुट प्रकार,
शास्त्रर श्रीमूर्ति आर भक्त कालेबर।।”
अर्थात:-
भगवान चैतन्य प्रभुंनी नाम संकीर्तनाचा महिमा आणि अहिंसा धर्म प्रचार प्रसार करत करत भक्ती आणि प्रेमाद्वारे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक विशेष आणि स्वतंत्र मार्ग दाखवला. किंबहुना त्यांची ही शिकवण म्हणजे मूर्तीपूजा, श्रीमद भागवत पठण आणि भक्ती याचा सार आहे.
कलियुगातील प्रभुंचा तिसरा अवतार – भगवान कल्कि
“भविष्य मालिका“ आणि विविध धर्मग्रंथांमध्ये “कलियुगाची 5000 वर्षे संपल्यानंतर या पृथ्वीवर भगवान कल्की अवतार घेतील” असा उल्लेख आहे. आता कलियुग 5,125 वर्षे चालू आहे. या महत्त्वाच्या वस्तुस्थितीच्या आधारे आपल्याला समजले पाहिजे की कलियुग संपले आहे. आता मानवी समाज संगम युगात जगत आहे. मानवी समाजाला लवकरच पृथ्वीवर भगवान कल्कींद्वारा धर्माची स्थापना होताना दिसेल.
“अथसु जुगसंध्यांसे दस्यु प्रयासेषु राजसु।
जनिता विष्णु यशो नमना कल्कि जगतपति।।”
अर्थात:-
जेव्हा कलियुगाचा संधीकाळ असेल तेव्हा भगवान कल्की भगवान विष्णूंची स्तुती गाणाऱ्या वैष्णव ब्राह्मणाच्या पुत्राच्या रूपात जन्म घेतील.
“संबल ग्राम मुख्यस्य ब्राह्मन्यस्य महात्मन ।
भबने विष्णु जशश्य कल्कि प्रादुर्भाबिश्यती ।।”
अर्थात:-
भगवान कल्की संबल गावातील प्रमुख ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतील, जे भगवान विष्णूंची स्तुती गात असतील. पापी आणि म्लेच्छांचा नाश करण्यासाठी भगवान पृथ्वीवर मानवी शरीरात अवतार घेतील.
जय श्री सत्य अनंत माधव